शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात 25 टक्क्यांनी घट येण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:49 IST

पावसाची 15 ते 17 टक्के तूट : नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुव्यात बिकट स्थिती

नंदुरबार : दोन तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली तरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या भागात उत्पादकता 20 ते 25 टक्यांनी घटनार आहे. येत्या काळात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईचाही सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील नवापूर व धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही ठणठणाट आहे.  दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही 15 ते 17 टक्के पावसाची तूट कायम आहे.  गेल्या आठवडय़ात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे पावसाची सरासरी 50 टक्केच्या वर गेली आहे. सरासरी वाढली असली पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. विशेषत: नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ाच्या भागात बिकट परिस्थिती आहे. पिकांची वाढ खुंटलीनंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यांमध्ये आणि अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीवरील भागात अपेक्षीत पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतक:यांमध्ये चिंता वाढली आहे. मका, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्यांनी घट येण्याची शक्यता आहे. येत्या काळातही पाऊस न आल्यास कापूसला मोठा फटका बसणार आहे. चार तालुक्यांची सरासरी कमीएकुण पावसाच्या सरासरीच्या तुलनेत नंदुरबार, शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पावसाची सरासरी 10 ते 25 टक्क्यांनी कमी आहे. नंदुरबार तालुक्यात सरासरी  41 टक्के पाऊस झाला आहे. येथे जवळपास 15 टक्के पावसाची तूट आहे. शहादा तालुक्यात सरासरीचा 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे 17 टक्के तूट आहे. तळोदा तालुक्यात 50 टक्के पाऊस झाला आहे. येथे सरासरी तूट 12 टक्के आहे. अक्कलकुवा तालुक्यात 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे तूट 14 टक्के आहे. नवापूरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुट जवळपास भरून निघाली आहे. तर धडगाव तालुक्यात 70 टक्के पाऊस होऊन येथे सरासरीच्या तुलनेत पाच ते सात टक्के अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे.  अवघा 36 टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा 36 टक्के पाणीसाठा आहे.  37 लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. शिवण प्रकल्पात 19 टक्के तर दरा 80 व राणीपूर 60 टक्के भरले आहेत.जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील प्रमाणे : हळदाणी 63 टक्के, खडकी सहा टक्के, खेकडा 76 टक्के, खोकसा 97 टक्के, मेंदीपाडा 20 टक्के, मुगधन 57 टक्के, नावली तीन टक्के, रायंगण, 80, सोनखडकी 23, सुलीपाडा 13, विसरवाडी 74, आंबेबारा 34, धनीबारा 30, खोलघर 28, कोकणीपाडा 5, पावला 5, शनिमांडळ 3, शिरवाडे 62, ठाणेपाडा 2- 15, ठाणेपाडा1- 5 , वासदरा 0, वसलाय 32, वावद 0, दुधखेडा 21, खापरखेडा 35, कोंढावळ 26, लगंडीभवानी 5, लोंढरे 8, राणीपूर 62, शहाणे 17, खडकुना 75, गढावली 0, महुपाडा 22, पाडळपूर 25, रोझवा 22, सिंगसपूर 58, उमराणी 27 टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो आहे. विरचक प्रकल्पात 20 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरा प्रकल्पात 82 टक्के पाणीसाठा आहे.