शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

कोरोनामुळे जिल्ह्यात यंदा केवळ ९७ टक्केच महसूली करांची झाली वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोनामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. बाधितांची संख्या वाढण्यासोबतच मृत्यूची संख्याही दुपटीने वाढली आहे. यातून जिल्ह्यात चिंता ...

नंदुरबार : कोरोनामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. बाधितांची संख्या वाढण्यासोबतच मृत्यूची संख्याही दुपटीने वाढली आहे. यातून जिल्ह्यात चिंता निर्माण होऊन प्रशासनाच्या इतर विभागांवर त्यांचा परिणाम झाल्याचे आता समोर येत आहे. यात प्रामुख्याने महसुली वसुलीचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसूल वसुली केवळ ९७ टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात साधारण १८ प्रकारच्या विविध करांची वार्षिक वसुली ३६ महसूल मंडलात नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्यांकडून ३१ मार्चअखेर करण्यात येते. यात गौण खनिज, रोजगार हमी, घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन, शिक्षण, जमीन महसूल, शेतसारा, मत्स्य, कोर्ट फी, मुद्रांक, बीडीडीआर, नोंदणीपत्र, जाहिरात, जमीन महसूल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती , सेस, इजीएस, अकृषक, सिटी सर्वे, वस्तीवाढ व नझूल यांचा समावेश आहे. २०१९ - २०२० या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने दिलेले ३८ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, अशी शक्यता होती. परंतु, याउलट महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरीस जिल्ह्यात ४४ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची वसुली केली होती. उद्दिष्टापेक्षा १६ टक्के अर्थात ११६. ०९ टक्के वसुली जिल्ह्यातून करण्यात आली होती.

जिल्ह्यातून गेल्या वर्षात वसुलीमुळे शासनाकडून २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला ५८ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले होते. परंतु, मार्च २०२१ अखेरीस केवळ ५६ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपयांची वसुली जिल्ह्याला करता आली आहे. केवळ ९७ टक्के वसुली झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्हा यंदा मागे असल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी ते मार्च २०२० या काळात कोरोना सोबत लढण्याची तयारी सुरू असतानाही महसूल विभागाने १०० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली केली होती. परंतु, यंदा मात्र कोरोनामुळे कर्मचारी बाहेर पडू न शकल्याने वसुली कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार ४९६ खातेदार शेतकरी आहेत. त्यांच्याकडून जमीन महसुलातून वसुली गेल्या चार वर्षात नियमित झाली आहे. अकृषक क्षेत्राची वसुली वाढली आहे. सन २०१६ - १८ मध्ये शासनाकडून जमीन महसूल व इतर करांपोटी २८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात येत होते. त्यातून जिल्ह्यात साधारणपणे १६ कोटी रुपयांची वसुली होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात ही वसुली १०० टक्के करण्यावर भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार या दोन मोठ्या तालुका व शहरी भागातून सर्वाधिक वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातून सरासरी १० कोटी रुपयांची महसुली वसुली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात दरवर्षी मालमत्तांमध्ये वाढ होत असल्याने करही वाढत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील जमीन - खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. सिनेमागृहे व जमिनीसंदर्भातील बांधकामेही बंद पडली होती. यातून सुमारे ७० टक्के वसुलीवर परिणाम झाला होता. असे असतानाही महसूल विभागाचे तलाठी व मंडल अधिकारी यांनी इतर करांची वसुली वाढवून उद्दिष्टपूर्तीला हातभार लावला आहे.

शासनाचा सर्वाधिक महसूल हा मुद्रांक खरेदी व विक्रीतून येतो. परंतु घर आणि जमीन खरेदी विक्रीसह इतर व्यवहार हे गेल्या वर्षीपासून कमी झाले आहेत. लाॅकडाऊन काळात दुय्यम निबंधकांकडे दिवसातून एखाद दुसरा व्यवहार नोंद होत होता. यातून मार्च ते मे या काळात व्यवहारांची संख्या घटल्याने शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या १६ दिवसांपासून या कार्यालयांमध्ये गजबज वाढली असून, खरेदी - विक्रीचे व्यवहार पूर्ववत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.