शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील कुपनलिकांना येतेय दरुगधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:39 IST

नंदुरबारातील प्रकार : भुमिगत गटारींचे पाणी ङिारपत असल्याची शक्यता

नंदुरबार :  भुर्गातील पाणी पातळी खोल गेल्याने नंदुरबार शहरातील खाजगी कुपनलिकांचे पाणी दुषीत येवू लागले आहे. रेल्वे पट्टयापलिकडील विशेषत: कन्यादान मंगल कार्यालपासून थेट नळवा शिवार्पयत तसेच वाघोदा शिवारातील काही वसाहतींमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कुपनलिका बंद करून ठेवल्या असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.शहरातील अनेक भागात पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक नागरिकांनी केलेल्या कुपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत. काही ठिकाणी जेमतेम पाणी असले तरी त्यातून दरुगधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे कुपनलिकाधारक नागरिकांना आता विकतचे पाणी वापरावे लागत आहे.नवीन वसाहतींच्या भागात नागरिक घर बांधकाम करतांनाच कुपनलिका करून घेतात. त्यामुळे पालिकेची नळजोडणी ते घेत नाहीत. शहरात आतार्पयतचा इतिहास पहाता तीव्र पाणी टंचाईची स्थिती कधी जाणवली नव्हती. त्यामुळे मे, जून महिन्यार्पयत खाजगी कुपनलिका सुरू राहत असे. यंदा मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने कुपनलिकांच्या पाण्याची पातळी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच खोल गेली होती. अनेक नागरिकांना कुपनलिकेतील विद्युत मोटार आणखी खोल टाकावी लागली आहे. आता मात्र, पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुपनलिका बंद करून ठेवल्या आहेत.दरुगधीयुक्त पाणीनळवा रस्त्यावरील तसेच मिशन विद्यालयाच्या मागील बाजूच्या वसाहतींमधील कुपनलिकांना सध्या दरुगधीयुक्त पाणी येऊ लागले आहे. आधीच पाण्याची पातळी खोल त्यात दरुगधीयुक्त पाणी येवू लागले आहे. हे पाणी पिण्यालायक नसल्याचे चित्र आहे. कुपनलिकांना दरुगधीयुक्त पाणी येण्याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. जर भुगर्भात पाणीच नाही तर पिवळ्या रंगाचे आणि दरुगधीयुक्त पाणी कसे बाहेर येत आहे याबाबतही चर्चा सुरू आहे. पालिकेने तपासणी करावीशहरातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याचे काम पालिकेचे असते. परंतु अशा प्रकारची तपासणी अनेक वर्षापासून झालेली नसल्याचे सांगण्यात आले. विरचक आणि आंबेबारा धरणातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरातील इतर स्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा हा पिण्यासाठी केला जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. खाजगी कुपनलिकाधारकांना स्वत:च पाण्याची तपासणी करून घ्यावी लागत असते.उताराचा भाग आणि ड्रेनेजचे पाणीशहरातील सर्व भागाचा उतार हा नळवा रोडवरील भागात आहे. त्यामुळेच पालिकेने नळवा शिवारात पाताळगंगा नदीच्या काठावर सिल्व्हर ट्रीटमेंट प्लान्ट अर्थात ड्रेनेजचे पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी जाणारे ड्रेनेजचे पाणी या भागातील वसाहतींमध्ये ठिकठिकाणी थाबून आहे. त्याला कारण ड्रेनेजचे चेंबर फुटणे, नादुरूस्त होणे हे आहे. त्यामुळे ते पाणी जमिनीत जिरून ते कुपनलिकांमध्ये जात असल्याचेही या भागातील नागरिकांचे म्हणने आहे. याबाबत पालिकेने चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.