शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आठवडाभर कोरडय़ा हवामानाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 15:06 IST

उत्तर महाराष्ट्र : बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती, वा:यांची दिशा दक्षिण-पूर्व

नंदुरबार : श्रीलंकेजवळील बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय भागाची निर्मिती झाली आह़े त्यामुळे वा:यांच्या दिशेत बदल होऊन परिणामी उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काही अंशी वाढ झाली आह़े येत्या काही दिवसात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े नंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े वातावरणीय बदलामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या हवामानतज्ज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी वर्तविला़ ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आह़े यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन परिणामी वा:यांची दिशा बदलली आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रासह राज्यात दक्षिणेकडून-पुव्रेकडे वारे वाहत आहेत़ त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता  वाढत आह़े उत्तर महाराष्ट्राची स्थितीनंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े तर, जळगावात कमाल 29.7, किमान 10.4, धुळे कमाल 31.1 तर, किमान 11.1, नाशिक कमाल 30.2 तर किमान 10.2, मालेगाव कमाल 28 तर किमान 12 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आह़े दरम्यान, आयएमडीकडून देण्यात आलेल्या इशा:यानुसार उत्तर महाराष्ट्रात ताशी 20 ते 25 किमी गतीने वारे वाहण्याचे सांगण्यात आले आह़े त्यामुळे उत्तरेकडून येणा:या शितलहरींना अडथळा निर्माण होऊन परिणामी थंडीत घट दिसून येईल़  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारात सकाळी तसेच रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आह़े तर दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा आह़े नंदुरबारात संमिश्र वातावरण असल्याचे दिसून येत आह़े  दरम्यान, बंगालच्या उपसागरात सध्या द्रोणीय भागामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आह़े परंतु तुर्त चक्रीवादळाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट दिसून आली़ तसेच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान  खाली गेले होत़े तसेच उर्वरीत राज्यात किमान तापमाना एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झालेली होती़ राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान : मुंबई (कुलाबा) 20.5, सांताक्रुझ 18.0, अलिबाग 18.8, रत्नागिरी 18.9, पणजी (गोवा) 19.1, डहाणू 17.7, पुणे 11.8,अहमदनगर 10.6, जळगाव 10.0, कोल्हापूर 16.5, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 11.6, नाशिक 11.0, सांगली 13.4, सातारा 13.4, सोलापूर 15.6, औरंगाबाद 12.0, परभणी 13.0, अकोला 11.7, अमरावती 11.4, बुलडाणा 12.0, चंद्रपूर 11.8, गोंदीया 8.0, नागपूर 7.3, यवतमाळ 14.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े कोरडय़ा हवामानातचा अंदाजराज्यात 20 जानेवारीर्पयत अंशत: कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे विदर्भात थंडीची लाट निर्माण होण्याचीही शक्यत वर्तविण्यात आली आह़े सर्वसाधारणत: संपूर्ण जानेवारी महिना थंडीचा जोर असतो़ तर त्यानंतर फेब्रुवारीपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असत़े यंदा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात कमी पजर्न्यमानामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे हिवाळा पाहिजे तसा जानवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ परंतु यंदा थंडीचा मुक्काम जानेवारीर्पयत कायम राहणार असल्याचे दिसून येत आह़े