शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण हवामानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:35 IST

उत्तर महाराष्ट्राची स्थिती : परतीच्या पावसाचा पट्टा महाराष्ट्राच्या सिमेत दाखल

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात 10 ऑक्टोबर्पयत उष्ण व कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आला आह़े  वेस्ट राजस्थानपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून अरबी समुद्राच्या इस्ट सेंट्रलपासून निघालेली परतीच्या पावसाचा पट्टा कोकण, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, गोंदीया अशा मार्गाने मध्य प्रदेशातून गेला आह़ेजळगाव जिल्ह्याला लागून परतीच्या पावसाचा पट्टा गेलेला असला तरीसुध्दा काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्राचे हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट राजस्थानपासून 29 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आह़े परतीच्या पावसाचा  पट्टा बुधवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून गेला आह़े यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील  बरेचसे जिल्हे यातून प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा पट्टा येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रमाणात अधिक वाढ होत आह़े त्याच प्रमाणे नंदुरबारात बुधवारी तब्बल 45 टक्के आद्रतेचे प्रमाण नोंदविण्यात आले आह़े अरबी समुद्रातून येणा:या बाष्पामुळे यात काही दिवसात अधिक वाढ होणार असल्याची माहिती आह़ेयंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरी केवळ 67 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़ेअद्याप पावसाची 30 टक्के तुट भरुन काढणे बाकी आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास परतीच्या पावसापासून फार काही लाभ झालेला आहे, असे नाही़ त्यामुळे मुख्य पावसाळी दिवसांवरच जिल्ह्यातील पजर्न्यमानाची स्थिती अवलंबून असत़े यंदा परतीच्या पावसालाही उशिर होणार असल्याचे हवामान खात्याकडून आधीच सांगण्यात आले होत़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पूर्णपणे व्यापण्यासाठी अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आह़ेजिल्ह्याच्या तापमानात वाढदरम्यान, गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून बुधवारी 39 अंश सेल्शिअसर्पयत नंदुरबारचे तापमान जावून पोहचले आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच हवालदिल झालेले आहेत़ परतीच्या पावसासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार असल्याने याचा परिणाम आता पिकांवरही जाणवनार असल्याचे चित्र स्पष्ट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी वाढणारसर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला वेस्ट राजस्थानपासून सुरुवात  होत असत़े परंतु परती पाऊस नेहमीच लेटलतिफ असतो़ त्यामुळे साहजिकच त्याचा जाण्याचा कालावधीही वाढत आह़े साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटार्पयत परतीचा पावसाचा कालावधी संपण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परंतु यातून प्रत्यक्षा पजर्न्यमानाचे प्रमाण किती असते, हे बघणे महत्वाचे ठरणार आह़े