शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:22 IST

सातपुडा परिसर : चाराटंचाई समस्येच्या निराकरणासाठी होताय प्रयत्न

सोमावल :   सातपुडा परिसरात कमी पर्जन्यमानामुळे पिण्याचा पाण्यासह चाराटंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चा:यासाठी गाळपेर जमीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून दुष्काळावर मात करण्यासाठी येथील जलाशयाखालील गाळपेर जमीनीत रब्बी चारा पीक उत्पादनासाठी मशागतीचे काम करीत आहेत़येथील परिसरात घेतल्या जाणा:या तृणधान्य, कडधान्य, ऊस व तेलबिया पिकाखालील क्षेत्रामुळे मोठय़ा प्रमाणात चारा पशुधनासाठी उपलब्ध होत असतो. येथे उपलब्ध होणारा बहुतेक चारा हा पावसाळ्यात पडणा:या पाण्यावर अवलंबून             असतो. मात्र मागील 4 ते 5 वर्षाच्या कालावधीपासून येथील हवामानात आमुलाग्र बदल होत गेल्याने पावसाळ्यात होणारे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी-कमी होत गेले. हीच परिस्थिती कायम राहिल्याने यंदा ते     50 टक्के सरासरी पेक्षा ही कमी  पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याची परिस्थिती आहे. बहुतेक शेतक:यांना खरीप हंगामाचा उत्पादन खर्च निघणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतक:यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध झाले नाही व पशुधनासाठी चारा देखील                म्हणावा तेवढा उपलब्ध होऊ शकला नाही.यंदा कमी झालेल्या परतीचा पावसामुळे रब्बी हंगामाची देखील पेरणीला पोषक वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या हंगामात घेतल्या जाणा:या रब्बी पिकासाठी आवश्यक असलेली जमीन मशागतीची कामे वेळेत पूर्ण करता आली नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरणीपूर्व पिकास आवश्यक असलेल्या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.सध्याच्या स्थितीत हिवाळा सुरु असून देखील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आह़े येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास खरीपासह रब्बी हंगाम देखील वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता खचला असून या कठीण परिस्थितीत पशुधनासाठी चा:याची सोय व्हावी या हेतूने धडपडत आहे.  यावर उपाय म्हणून प्रशासनाने चा:यासाठी जलाशयाखालील गाळपेर जमिन उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, हवामानात वारंवार होणा:या आमुलाग्र बदलामुळे पावसाळ्यात होणारे पर्जन्यामान दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याने येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रशासनाने यावर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजनांचा बहुवार्षिक आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.