शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:22 IST

सातपुडा परिसर : चाराटंचाई समस्येच्या निराकरणासाठी होताय प्रयत्न

सोमावल :   सातपुडा परिसरात कमी पर्जन्यमानामुळे पिण्याचा पाण्यासह चाराटंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चा:यासाठी गाळपेर जमीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून दुष्काळावर मात करण्यासाठी येथील जलाशयाखालील गाळपेर जमीनीत रब्बी चारा पीक उत्पादनासाठी मशागतीचे काम करीत आहेत़येथील परिसरात घेतल्या जाणा:या तृणधान्य, कडधान्य, ऊस व तेलबिया पिकाखालील क्षेत्रामुळे मोठय़ा प्रमाणात चारा पशुधनासाठी उपलब्ध होत असतो. येथे उपलब्ध होणारा बहुतेक चारा हा पावसाळ्यात पडणा:या पाण्यावर अवलंबून             असतो. मात्र मागील 4 ते 5 वर्षाच्या कालावधीपासून येथील हवामानात आमुलाग्र बदल होत गेल्याने पावसाळ्यात होणारे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी-कमी होत गेले. हीच परिस्थिती कायम राहिल्याने यंदा ते     50 टक्के सरासरी पेक्षा ही कमी  पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याची परिस्थिती आहे. बहुतेक शेतक:यांना खरीप हंगामाचा उत्पादन खर्च निघणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतक:यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध झाले नाही व पशुधनासाठी चारा देखील                म्हणावा तेवढा उपलब्ध होऊ शकला नाही.यंदा कमी झालेल्या परतीचा पावसामुळे रब्बी हंगामाची देखील पेरणीला पोषक वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या हंगामात घेतल्या जाणा:या रब्बी पिकासाठी आवश्यक असलेली जमीन मशागतीची कामे वेळेत पूर्ण करता आली नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरणीपूर्व पिकास आवश्यक असलेल्या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.सध्याच्या स्थितीत हिवाळा सुरु असून देखील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आह़े येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास खरीपासह रब्बी हंगाम देखील वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता खचला असून या कठीण परिस्थितीत पशुधनासाठी चा:याची सोय व्हावी या हेतूने धडपडत आहे.  यावर उपाय म्हणून प्रशासनाने चा:यासाठी जलाशयाखालील गाळपेर जमिन उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, हवामानात वारंवार होणा:या आमुलाग्र बदलामुळे पावसाळ्यात होणारे पर्जन्यामान दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याने येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रशासनाने यावर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजनांचा बहुवार्षिक आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.