शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

चौथीनंतर शाळा सोडण्याचे प्रमाण अधीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण अर्थात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणार आहे. सातवीपर्यंत शाळा सोडणाºया ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण अर्थात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणार आहे. सातवीपर्यंत शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांना सर्व्हे करून शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते परंतु सातवी आणि दहावीनंतर शिक्षण सोडणाऱ्यांना मात्र कुणीही वाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराचा अभाव आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या लक्षात घेता अर्ध्यातूनच शाळ सोडणाºयांचे प्रमाण अधीक आहे. दरवर्षी किमान ५०० ते १२०० विद्यार्थी अर्ध्यातून शाळा सोडत असतात. त्यात चौथी पास झाल्यानंतर पाचवीत प्रवेश न घेणे, जेथे जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा आहेत तेथून आठवीत माध्यमिक शाळेत प्रवेश न घेणे व दहावी उत्तीर्णनंतर पुढे शिकण्याची उमेद नसणे असे चित्र आहे.जिल्ह्यात मजुरांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. शाळाबाह्य विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. आता अर्ध्यातूनच शिक्षण सोडणाºया विद्यार्थ्यांची आकडेवारी देखील चिंतेत भर घालणारी ठरत आहे.शासनातर्फे आश्रमशाळा, वस्तीगृह, गाव तेथे शाळेची सुविधा, आंतरराष्टÑीय शाळेसारखे उपक्रम, इंग्रजी माध्यमाची निवासी आश्रमशाळा, आरटीईअंतर्गत नामांकीत शाळांमध्ये देण्यात येणारे प्रवेश अशा सुविधा आणि सोयी असतांना अध्यार्तून शिक्षण सोडलेले, शाळेत नाव आहे पण शाळेत न येणे अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.जिल्ह्यातून दरवर्षी हजारो कुटूंब शेजारच्या गुजरात राज्यात किंवा इतर जिल्ह्यात सहा ते आठ महिने मजुरीसाठी जातात. अशावेळी आपल्या लहान मुलांना देखील सोबत घेऊन जातात. त्यामुळे अशा मुलांना अर्ध्यातूनच शाळ सोडावी लागते. परिणामी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढते. जे शाळाबाह्य विद्यार्थी नंतर शाळेच्या मुख्य प्रवाहात येतात, ते पुढे टिकून राहतात. जे प्रवाहात येत नाही ते कायमचेच शाळेपासून दूरावतात. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.परराज्यात मजुरीसाठी गेलेल्या कुटूंबातील मुलांना परत आणून हंगामी वसतिगृहात त्यांची सोय करण्यासाठी व स्थलांतरीत होऊन आलेल्या मुलांना स्थानिक शाळांमध्ये दाखल करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.दहावीनंतर शाळा सोडणारे विद्यार्थी आपल्या गरिबीच्य परिस्थीतमुळे लागलीच रोजगार शोधत असतात. त्यामुळे ते पुढील शिक्षणापासून वंचीत राहतात.२०१८-१९ मध्ये करण्यात आलेल्या नोंदीनुसार चौथीनंतर शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४९२ इतके होते. गेल्यावर्षी ते ३६ वर आणण्यात यश आले. शिवाय शाळेत नाव आहे, परंतु शाळेत येतच नाहीत असे विद्यार्थी ५,८३४ होते यंदा तीच संख्या गेल्यावर्षी ७३९ वर आली आहे. ३० दिवसांपेक्षा अधीक दिवस शाळेत हजेरी न लावणारे विद्यार्थी ६,३६८ होते. गेल्यावर्षी ९६९ आढळून आले. चौथीनंतर शाळा सोडल्याचा दाखला न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३,३६७ होती गेल्यावर्षी ती ५४२ इतकी राहिली.विद्यार्थ्यांनी अर्ध्यातूनच शाळा सोडू नये यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न असतो. यासाठी शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे, त्यांना शाळेत दाखल करणे, जे विद्यार्थी पटावर आहेत परंतु शाळेत येतच नाही त्यांना शाळेत आणणे, स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करणे असे प्रयोग राबविण्यात येतात. त्यामुळे शाळा सोडणाºयांचे आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.-एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.नंदुरबार.