शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धांद्रे खुर्द गावाला नाल्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

जयनगर गावाच्या उत्तर दिशेला गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर धांद्रे खुर्द हे ५०० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासी ...

जयनगर गावाच्या उत्तर दिशेला गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर धांद्रे खुर्द हे ५०० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासी समाजातील नागरिक मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षाचा कालावधी लोटला तरीही अद्याप या गावाला महसुली दर्जा प्राप्त झालेला नाही. महसूल व पंचायत समिती दप्तरी या गावाची नोंद नसल्याने गावात विकासासाठी व ग्रामस्थांना वैयक्तिक योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. गावाला महसुली दर्जा नसल्याने आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळत नाही. काही ग्रामस्थांची नावे इतर गावाला असल्याने त्यांना तेथून स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून घ्यावे लागते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या गावातील नागरिकांना अन्नधान्यासाठी ताटकळत राहावे लागते. पावसाळ्यात नाल्याला पाणी येत असल्याने धांद्रे गावातील विद्यार्थी नाल्यातील वाहत्या पाण्यातून जाऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. धांद्रे खुर्द ग्रामस्थांना अनेक वर्षापासून भेडसावणारी ही समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाळ्यात रोजगार बुडून होते उपासमार

धांद्रे खुर्द गाव जयनगर गावाच्या रस्त्याच्या एक किलोमीटर अंतरावर आहे. या गावाकडे जाताना मध्येच नाला लागतो. या नाल्याचा गावाच्या चौफेर विळखा असल्याने ग्रामस्थांना नाल्यातूनच मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याला सहा ते सात फूट पाणी ओसंडून वाहते. जेवढा वेळ किंवा दिवस नाल्यात पाणी असेल तोपर्यंत ग्रामस्थांचा इतर गावांशी शेती कामे करण्यासाठी संपर्क तुटतो. बऱ्याचवेळा रात्री-बेरात्री एखाद्या ग्रामस्थाची प्रकृती बिघडल्यास त्याला वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जयनगर किंवा शहादा येथे रुग्णालयात नेण्यासाठी नाल्यातून कसरत करून बाहेर निघावे लागते. ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन नाल्यातील पाच ते सहा फूट पाण्यातून जावे लागते. आठ-आठ दिवस मजुरांना कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने पावसाळ्यात त्यांची व कुटुंबाची उपासमार होते.