शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाण्याच्या गुणवत्तेवर निर्माण होतेय शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:54 IST

नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड ...

नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे़ पावसाळा जवळ असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ विशेष म्हणजे ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्यात देखभाल दुरुस्तीबाबत संभ्रमावस्था आहे़सन २०११-२०१२ दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३८६ शाळांपैकी १३४ शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले होते़ परंतु देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वॉटर प्युरिफायर काम करीत नसल्याची माहिती आहे़ देखभाल दुरुस्तीचा खर्च विशेष फंडातून मिळत असला तरीही संबंधित प्रशासनाच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीचे काम टाळण्यात येत असते़ त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या भावना जनसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहेत़ पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे़ विद्यार्थ्यांवरचे ओझे कमी व्हावे, त्यांना घरुन पाणी न आणता शाळेमध्येच शुध्द पाणी मिळावे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत शाळेतील पाण्याच्या स्त्रोतांना वॉटर प्युरिफायर बसविण्याची योजना अंमलात आणण्यात आली होती़ त्यानंतर अनेक वर्षांनी या वॉटर प्लॅन्टमधून शुध्द पाणी येतेय की नाही? हे तपासणी करण्याचे आदेश शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले आहे़ उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होण्याच्या आत वॉटर प्युरीफायरमध्ये काही तृटी असल्यास उपाय योजना करणे गरजेचे आहे़ परंतु याबाबत माहितीची जुळवा-जुळव करण्यातच शिक्षण विभागाचा वेळ जात असल्याने पुढील कार्यवाही होणार कधी असा प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ शिक्षण विभागाने जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सर्व वॉटर प्युरिफायरचे नमूने तपासून वॉटर प्युरिफायरमधून येणारे पाणी शुध्द आहे किंवा नाही तसेच प्युरिफायर सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरची पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुुषित पाण्याची समस्या निर्माण होत असते़ ग्रामीण भागात यात अधिकच भर पडत असते़ जनगणनेसोबतच इरतही अनेक शासकीय कामे थर्ड पार्टी कंपनीला लावून करण्याचे नवे फॅड सध्या प्रसिध्द आहे़ त्यामुळे पाण्याचे नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करण्यासाठीही अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे़