शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग १५ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा दुप्पटीचा वेग १२ दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सद्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा दुप्पटीचा वेग १२ दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सद्य स्थितीत ७८ बाधीत असून त्यातील ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वयोगट देखील सर्वच गटातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभुमीवर गेल्या चार दिवसांपासून नंदुरबारात लॉकडाऊन करण्यात आले. त्याला जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर १८ एप्रिलपासून सुरू आहे. सुरुवातीला कोरोना रुग्णाचा वाढीचा दर हा स्थिर होता. किमान ८ ते जास्तीत जास्त १५ दिवसात रुग्ण आढळत होते. परंतु लॉकडाऊनमध्ये जशी शिथीलता मिळत गेली तसे रुग्ण वाढीचा वेग देखील वाढत गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सद्य स्थितीत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शतकाकडे वाटचाल करू लागला आहे.लॉकडाऊन शिथिलता मुळावरजिल्ह्यात एक ते तीन लॉकडाऊनच्या दरम्यान रुग्ण वाढीचा वेग अतीशय कमी होता. तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत संख्या २४ पर्यंत मर्यादीत होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा आॅरेेंजझोन मध्ये आल्यानंतर विविध बाबींमध्ये शिथीलता दिली गेली. त्यामुळे व्यवहार सर्वसामान्य झाल्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या वाढत गेली. ती जिल्हावासीयांच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे काही निर्बंधांची कडक अमंलबजावणी होणे आता अपेक्षीत झाले आहे.संपर्क साखळी वाढलीजिल्ह्यात गेल्या २ आठवड्यापूर्वी दिवसभर बाजार सुरू ठेवणे, एस.टी.बस वाहतूक सुरू करणे, प्रवासी वाहनांना परवाणगी देणे यासह अनेकांनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्याने संपर्क साखळी वाढण्यात मदत झाली. याशिवाय जिल्हाबाहेरून येणाऱ्यांवरही निर्बंध शिथील केल्याने त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आॅरेंज झोन जाहीर होईपर्यंत रुग्णसंख्या २४ होती. त्यानंतर गेल्या १२ दिवसापर्यंत संख्या ३४ वर येऊन पोहचली. मात्र त्यानंतर ती थेट ७८ वर आली आहे. दुप्पटीचा ेवेग हा १२ ते १६ दिवसांवर येऊन ठेपला आहे.येत्या काळात नागरिकांनी काळजी घेतली नाही, संपर्क साखळी खंडित करण्याचा प्रयत्न झाला नाही तर संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास, जिल्हाबाहेरून आलेल्यांनी आपली काळजी घेत आरोग्य यंत्रणेला माहिती देवून आरोग्य तपासणी करून घेतल्यास मोठा फरक पडणार आहे. त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.तळोदाही प्रभावीतजिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपर्यंत तळोदा व धडगाव हे दोन तालुके कोरोनापासून दूर होते. परंतु मुंबई व इतर प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळे तळोदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भावर वाढल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसात तळोद्यात थेट आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तळोदाही आता कोरोना प्रभावीत झाला आहे. दुर्गम भागातील मोलगी येथेही एक रुग्ण आढळून आला आहे. आता केवळ धडगाव तालुका कोरोनापासून मुक्त आहे. तो तालुका तसाच राहावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सुदैवाने उत्तर महाराष्टÑात नंदुरबार जिल्ह्यातच कोरोनाचा आकडा १०० च्या आत आहे.दुधाळे शिवारातील एक रुग्णदुधाळे शिवारातील कोकणीहिल भागातील गंगाईनगर येथील एक युवक नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या भागात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. सकाळी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय दुधाळे गाव आणि शिवारातील विविध वसाहतींमधील व्यावसायिकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संबधित रूग्णाच्या परिवारातील सदस्यांना आरोग्य तपासणीसाठी सकाळी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

नंदुरबारात मंगळवारपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी शुक्रवारी मध्यरात्री संपला. त्यामुळे शनिवारपासून दिवसभर व्यवहार सुरळीत होणार आहेत. अर्थात पूर्वीप्रमाणेच सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू करण्यास परवाणगी राहणार आहे. याशिवाय शहरातील चारही भागात लावण्यात आलेले बॅरीकेट्स काढण्यात येणार असून ज्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण राहत नाही अशा ठिकाणी ते कायम ठेवण्यात येणार आहे. चार दिवसात संपर्क साखळी तोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. दरम्यान, रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत मनाई आदेश राहतील.