शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कामासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळू नका,सर्वेक्षणानुसार सरसकट खावटीच्या लाभ द्या,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठ ते दहा महिन्यांपासून खावटी अनुदान योजनेची कार्यवाही संथगतीने ...

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठ ते दहा महिन्यांपासून खावटी अनुदान योजनेची कार्यवाही संथगतीने सुरू असून अद्यापपर्यंत आदिवासीना त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळालेला नाही. आता आदिवासीनी खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळेल याची आशा सोडून दिलेली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात कारकुनी व कागदपत्राच्या कचाट्यात सापडली असून लाभार्थ्यांकडून अनावश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्याचा ससेमिरा लावला आहे.

या सर्व बाबींना आदिवासी देखील मोठ्या प्रमाणात कंटाळले आहेत. आता नव्याने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना पुन्हा गावागावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांचे जातीचे दाखले किंवा जातीच्या दाखल्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची दाखले गोळा करणे, तसेच तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडील उर्वरित कारवाई करून घेण्याबाबत आदेश आपल्या स्तरावरून देण्यात आले आहेत. परंतु सध्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना गावागावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांकडून अशाप्रकारे कागदपत्र जमा करून घेण्याची कार्यवाही करायला लावणे, हे त्यांच्या जीवाशी खेळण्याबरोबर आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे हे काम करत असताना एखादा कर्मचारी कोरोना बाधित झाला तर त्याचे सर्व कुटुंबीय धोक्यात येऊ शकतात, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या उलटदेखील परिस्थिती अशीच असून खावटीचे कामकाज करणारे अनेक शिक्षकदेखील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. अनेक शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी स्वॅब दिले असून या पार्श्वभूमीवर त्यांना गावागावात जाऊन कागदपत्ो गोळा करायला लावणे म्हणजे अप्रत्यक्षपणे कोरानाचा प्रचार-प्रसार करायला प्रवृत्त करण्यासारखे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

काही ठिकाणी शिक्षक हे ग्रामीण भागात जाऊन खावटीचे काम करत असल्याने त्यांना ग्रामीण भागातील विरोधाला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावात त्यांना प्रवेश दिला जात नसल्याची बाब समोर आली आहे. आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ मिळावा, हीच सर्वांची भूमिका असून प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. जास्त कागदपत्रांच्या भानगडीत न पडता आजच्या प्रतिकूल परिस्थितीत तरी आदिवासीना आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सरसकट खावटी अनुदान योजनेच्या लाभ देण्यात यावा व कागदपत्रे मिळविण्यासाठी विनाकारण कर्मचाऱ्यांना व लाभार्थ्याना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.