शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सामान घेण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक शहरात गस्त घालून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करीत आहेत. पहिले दोन दिवस वगळता आता नागरिकांमध्ये हळूहळू प्रशासनाचे म्हणणे रुजत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला विक्रीसाठीही शहरात ठिकठिकाणी सोय करण्यात आली असून नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.वाघ यांनी केले आहे.पोलिसांकडून गस्तसंचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सकाळी बाजारपेठेत भाजीपाला, दूध, धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दिवसभरात पोलिसांकडून वाहनधारकांची चौकशी करून त्यांना माघारी पाठविण्यात आले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना तंबीही देण्यात आली. दिवसभर पोलिसांकडून शहरात गस्त घालण्यात येत असून काहींना पोलिसांकडून ‘प्रसाद’ही दिला जात आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून घरी थांबणे योग्य समजावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी केले आहे.प्रांताधिकाºयांचे आवाहनशहाद्यातील कष्टकºयांच्या सोयीसाठी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. रोजंदारीने उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून गिरासे यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. शासनाकडून मार्च व एप्रिल महिन्याचे धान्य मिळणार असले तरी सध्या इतर जीवनावश्यक वस्तू देणे आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संघटना मदत करण्यासाठी इच्छुक असून सालदारनगर, शिवाजीनगर यासह इतर गरीब लोकांच्या वस्तीत गरजू कुटुंबांना किमान चार-पाच दिवस जीवनावश्यक वस्तूंची किट देणे योग्य ठरेल. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांनी जर किट्स विकत घेऊन जमा केल्यास गरीब वस्तीत नगरपालिका प्रशासनामार्फत वाटप करण्याचे नियोजन करता येईल. नगरपालिकेची टीम तयार करून एका ठिकाणी किट्स जमा करुन स्वयंसेवी संस्थांचे एक दोन प्रतिनिधी व नगरपालिका कर्मचाºयांमार्फत ते वितरीत करता येईल. इच्छुकांनी मदत देण्यासाठी लक्ष्मण कोळी (मो.८३२९८१७०३३), संदीप टेंभेकर (मो.८६६९१३२७२३) व चेतन गांगुर्डे (मो.८२७५५६३९३९) या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.