शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

महिला सक्षमीकरणाच्या निव्वळ गप्पा नको, काम हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:31 IST

शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षा समित्या प्रभावीपणे कार्यरत नाहीत.

-मनोज शेलारमहिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जात असतांना आजही शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षा समित्या प्रभावीपणे कार्यरत नाहीत. कार्यालयांमध्ये महिलांसाठी वेगळा कक्ष, स्वच्छतागृहे यांची दैनावस्था आहे. शासनाने मंजुर केलेल्या वन स्टॉप सेंटरला जागेची अडचण कायम आहे. आदिवासी भागात डाकीणच्या संशयावरून आजही महिलांवर अत्याचार केले जात आहेत. ८ मार्च रोजी महिला दिन साजरा होतांना केवळ भाषणबाजी आणि कार्यक्रमांची रेलचेल ठेवतांना या बाबींकडेही गांभिर्याने पाहिले पाहिजे.आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या सर्वच क्षेत्रात योगदान देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाने निवडून आलेल्या महिला सक्षमपणे आपला कारभार सांभाळत आहेत. विविध शासकीय कार्यालयांमध्ये मुख्य पदांवर बसलेल्या महिला अधिकारी आपल्या कामाची वेगळी छाप पाडत आहेत. असे असतांना मात्र महिलांचे कायदे, त्यांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षीतता, अंधश्रद्धेतून महिलांवर होणारे अत्याचार या बाबींकडेही पहाणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात राजकीय क्षेत्राचा विचार केला तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून एक महिला खासदार निवडून आल्या आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील महिलाच आहेत. चार नगर पालिकांपैकी नंदुरबार व नवापूर या दोन नगरपालिकांमध्ये महिला नगराध्यक्षा आहेत. जिल्ह्यातील ५० टक्केपेक्षा अधीक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच समर्थपणे आपल्या गावगाड्याचा कारभार सांभाळत आहेत. प्रशासनात देखील महिला मागे नाहीत. सहायक जिल्हाधिकारी पदावर असलेल्या वान्मती सी. या महिला आणि तरुणींसमोर एक आदर्श उदाहरण आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागात देखील महिला अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत.असे सर्व असतांना काही बाबींमध्ये मात्र महिला आजही असुरक्षीत किंवा अडचणींचा सामना करीत आहेत. शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कंपनीच्या कार्यालयांमध्ये काम करतांना महिलांना आराम कक्ष, स्वच्छतागृहे किंवा त्यांना सोयीचे होईल अशा सुविधा पुरविण्यात संबधीत विभाग असमर्थ आहेत असेच म्हणावे लागेल. राज्य महिला आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला सुरक्षा व दक्षता समिती असणे आवश्यक असते. परंतु गेल्या महिन्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नंदुरबारात आल्या असता त्यांना अशा प्रकारच्या समित्या जिल्ह्यात ९० टक्के कार्यालयात कार्यरत नसल्याचे दिसून आले. ज्या होत्या त्या देखील कालबाह्य नियम आणि कायद्यान्वये बनविलेल्या होत्या. त्यामुळे त्या सर्व बरखास्त करून नव्याने दोन महिन्यात अशा समिती नेमण्याच्या राज्य अध्यक्षा सुचना देवून गेल्या आहेत. वन स्टॉप सेंटरला देखील अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. खासदार त्यासाठी आग्रही आहेत. महिलेला मारहाण झाल्यास लागलीच तिच्यावर उपचार करणे, मानसिक छळ झाल्यास समुपदेशन करणे, गुन्हा दाखल करण्यासाठी मदत करणे, वकिलांची मदत देणे यासह इतर सर्व मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. सुरुवातीला हे केंद्र जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू करणे व त्यानंतर ते शासकीय जागा उपलब्ध झाल्यावर तेथे सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे, परंतु हालचाल थंडावली आहे.आदिवासी दुर्गम भागात आजही महिलेला डाकीण संबोधून तिच्यावर अत्याचाराचे प्रकरणे वेळोवेळी समोर येत आहेत. कठोर कायदा करून, जनजागृती करूनही अशी प्रकरणे समोर येत असल्यामुळे महिला आजही अशा भागात सुरक्षीत कशा राहतील हा प्रश्नच आहे. सुदैवाने जिल्ह्यात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे. एकुणच ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करतांना केवळ महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारण्यापेक्षा अशा मुद्यांवर आणि विषयांवर काम करून महिलांना न्याय दिल्यास ते खरे महिला सक्षमीकरण ठरेल असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.