शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जिवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.गदीमुुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. पेट्रोल, डिझेल, किराणा सामान, दूध, अंडी, मांस, फळे, भाजीपाला, ब्रेड, मासे आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याने एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच वस्तूंचा अतिरिक्त साठादेखील करू नये. स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी यांनी समन्वयाद्वारे दुकानांची वेळ निश्चित करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना जिल्ह्यात येण्यास व बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या वाहतूकीत काही अडथळे आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपल्या वाहनांवर ह्यअत्यावश्यक सेवाह्ण असे ठळकपणे दिसणारे स्टीकर लावावे. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे व अनावश्यक बाहेर फिरू नये. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जागतिक आरोग्य संघटना, केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत आलेल्या सुचनांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे.ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमकरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वैयक्तिक व परिसराची स्वच्छता राखण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक भाषेतून संदेश देण्यात येत आहे. घंटागाडी व रिक्शद्वारे संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे.बाहेरून आलेल्या प्रवाशांचे प्रबोधनबाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आलेल्या प्रवाशांचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रबोधन करण्यात येत असून त्यांना आवश्यक दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. आवश्यकता असल्यास क्वॉरंटाईन केंद्रात त्यांना ठेवण्यात येत आहे. काही व्यक्तिंना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरात येथून आलेल्या मजूरांचीदेखील आमलाड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली.चोख पोलीस बंदोबस्तसंचारबंदीचे पालन योग्यरितीने होण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.अनावश्यक बाहेर फिरणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याबरोबर गरजू व्यक्तीस मदत करताना पोलिसातल्या माणूसकीचे दर्शनही अशावेळी घडते आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात येणाº्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलीस दलामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांना सहकायार्साठी २०० होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी होमगार्ड महासमादेशक यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. जिल्ह्यात संचारबंदीची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी होमगार्डची सेवा उपयोगी ठरणार आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन केंद्रात बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या संशयित व्यक्तिंना ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत क्वॉरंटाईन व्यक्तिंचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. भविष्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास व संसर्ग वाढल्यास आवश्यक तयारीचा भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षेच्या साधनांची पुरेशा प्रमाणात तातडीन व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी यंत्रणेला दिले. चेहºयाचे आच्छादन, गॉगल, मास्क आदी आवश्यक साहित्य आयसोलेशन सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध असावे असे त्यांनी सांगितले.