शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य शेतीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठा वाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर, तापीवरील बॅरेजस, इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठा वाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर, तापीवरील बॅरेजस, इतर लहान मोठय़ा नदींवरील बंधारे आणि शेततळे या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करता येऊ शकतो त्यासाठी नियोजन आणि मार्गदर्शनाची गरज आहे. येत्या काळात या व्यवसायाला अधीक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसायावर आधारीत एक दिवशीय चर्चासत्रात देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, केंद्रीय मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.एन.के.चड्डा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.किरण दुबे, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., के.बी.राजू, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त किरण पाडवी उपस्थित होते. जलकृषी की तकनीकी जागृकता, भारतीय कृषी अनुसंधान प्रकल्प, केंद्रीय मस्त्यिकी शिक्षण संस्था मुंबई, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.एन.के.चड्डा यांनी मत्स्य उत्पादन, त्याचे बारकावे, कुठल्या पाण्यात कसे उत्पादन व कुठल्या जातीचे उत्पादन घेतले जावे, संगोपन आणि संवर्धन यासह इतर अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. समुद्र आणि समुद्र तटावरच मत्स्य उत्पादन ही बाब आता कालबाह्य ठरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात आणि   व्यावसायात मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक:यांना मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानासाठी जास्तीत जास्त माहिती देणे हा चर्चासत्राचा उद्देश आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रय} केला     जाईल. शेतक:यांशी चर्चा करून महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पोषक वातावरण आहे त्या ठिकाणी मत्स्यव्यवसायातून शेतक:यांना अधिकाधिक फायदा होईल याकडे लक्ष देण्याचा आपला प्रय} असल्याचेही डॉ.चड्डा यांनी सांगितले.डॉ.किरण दुबे यांनी या व्यवसायातील मार्केटींग आणि इतर बाबींविषयी मार्गदर्शन केले.के.बी.राजू यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले, जिल्ह्यातून तापी, नर्मदा, रंगावली या नद्या व इतर प्रकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायास मोठा वाव आहे. जिल्ह्यातील शेतक:यांनी शेतीबरोबरच मत्स्यव्यसाय जोडधंदा म्हणून केल्यास शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो. या व्यवसायासाठी जिल्हा नियोजन समिती व आदिवासी विकास प्रकल्पातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी   सांगितले.यावेळी मच्छीमार सोसायटीचे सदस्य व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमधील उदय आणि इतर नद्यांमध्ये या भागातील आदिवासी मच्छिमार संस्था मोठय़ा प्रमाणावर माशांचे उत्पादन घेत आहे.जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या देखील वाढली आहे. शेततळ्यांमध्ये देखील मत्स्य उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमध्ये देखील मत्स्य बीज मोठय़ा प्रमाणावर सोडण्यात आले आहे.