लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन कालावधीत परराज्यात स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी व पाठविण्यासाठी श्रमीक रेल्वे तिकिटाच्या शुल्काचे २५ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले आहेत.परराज्यात अडकलेले व राज्यातून परराज्यात जाणाऱ्या जिल्ह्यातील मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मागणीनुसार जिल्ह्यांना तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले जात आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला २५ लाख रुपये मिळाले आहेत.मजुरांना राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या मागणीनुसार २५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.जिल्ह्यातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रमीक रेल्वे तिकिटाचे जिल्ह्याला २५ लाख प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:11 IST