शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. धडगाव येथे ही सभा शुक्रवारी घेण्यात आली. धडगाव येथील बीआयआरसीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. धडगाव येथे ही सभा शुक्रवारी घेण्यात आली. धडगाव येथील बीआयआरसीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तोरणमाळ नंतर धडगाव येथे स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, सभापती हिराबाई पाडवी, लता पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केवळ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. धोरणात्मक निर्णय किंवा ठराव करण्यात आला नाही. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सदस्यांनी अनेक विषयांवर तक्रारींचा सूर लावला. लघु सिंचन विभागाअंतर्गत नाला खोलीकरण, गाळ काढणे यासह इतर कामांबाबत गेल्या बैठकीत सदस्यांनी तक्रार केली होती. कामे न करता बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप गेल्या बैठकीत अभिजीत पाटील यांनी केला होता. त्याच विषयावर आजच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली.  दर वेळच्या बैठकीत त्याच त्या विषयांवर चर्चा होते, परंतु कार्यवाही व परिणाम काहीच दिसून येत नाही यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला.लघु सिंचन विभागाचे कुणीही अधिकारी किंवा प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे सुहास नाईक यांनी संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.दुर्गम भागात शिक्षकांची संख्या कमी, ग्रामसेवकांची अनियमितता याबाबत रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. अधिकारी केवळ भेटी देवून काही कर्मचा:यांवर कारवाई करतात. या भेटींचा वेगळा उद्देश देखील राहत तर नाही ना? असा संशयात्मक सूर देखील त्यांनी व्यक्त      केला. नर्मदा खो:यातील दुर्गम भागात भेट देण्याचे  अधिकारी टाळतात. तेथे कसे काम चालते. काय सुरू    आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र सुरू आहेत काय? कर्मचारी नियमित राहतात काय? याची किती आणि कशी चौकशी केली, भेटी दिल्या याची माहिती कधी दिली जाते काय? असे एक ना अनेक प्रश्न पाडवी यांनी उपस्थित     केले.शाळा बाह्य विद्याथ्र्याचे सव्र्हेक्षण करण्याबाबत नाईक यांनी सुचीत केले. तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सुचित केले. दुर्गम भागात जिल्हा परिषदेची बैठक घेण्याचा हा दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी तोरणमाळ येथे अशा प्रकारची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आता या पंचवार्षीकच्या शेवटी धडगावला बैठक घेण्यात आली. अशा बैठकीतून काय निष्पन्न होते याबाबत मात्र, पदाधिकारी व सदस्यही अनभिज्ञ आहेत.