शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. धडगाव येथे ही सभा शुक्रवारी घेण्यात आली. धडगाव येथील बीआयआरसीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. धडगाव येथे ही सभा शुक्रवारी घेण्यात आली. धडगाव येथील बीआयआरसीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तोरणमाळ नंतर धडगाव येथे स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, सभापती हिराबाई पाडवी, लता पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केवळ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. धोरणात्मक निर्णय किंवा ठराव करण्यात आला नाही. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सदस्यांनी अनेक विषयांवर तक्रारींचा सूर लावला. लघु सिंचन विभागाअंतर्गत नाला खोलीकरण, गाळ काढणे यासह इतर कामांबाबत गेल्या बैठकीत सदस्यांनी तक्रार केली होती. कामे न करता बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप गेल्या बैठकीत अभिजीत पाटील यांनी केला होता. त्याच विषयावर आजच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली.  दर वेळच्या बैठकीत त्याच त्या विषयांवर चर्चा होते, परंतु कार्यवाही व परिणाम काहीच दिसून येत नाही यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला.लघु सिंचन विभागाचे कुणीही अधिकारी किंवा प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे सुहास नाईक यांनी संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.दुर्गम भागात शिक्षकांची संख्या कमी, ग्रामसेवकांची अनियमितता याबाबत रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. अधिकारी केवळ भेटी देवून काही कर्मचा:यांवर कारवाई करतात. या भेटींचा वेगळा उद्देश देखील राहत तर नाही ना? असा संशयात्मक सूर देखील त्यांनी व्यक्त      केला. नर्मदा खो:यातील दुर्गम भागात भेट देण्याचे  अधिकारी टाळतात. तेथे कसे काम चालते. काय सुरू    आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र सुरू आहेत काय? कर्मचारी नियमित राहतात काय? याची किती आणि कशी चौकशी केली, भेटी दिल्या याची माहिती कधी दिली जाते काय? असे एक ना अनेक प्रश्न पाडवी यांनी उपस्थित     केले.शाळा बाह्य विद्याथ्र्याचे सव्र्हेक्षण करण्याबाबत नाईक यांनी सुचीत केले. तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सुचित केले. दुर्गम भागात जिल्हा परिषदेची बैठक घेण्याचा हा दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी तोरणमाळ येथे अशा प्रकारची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आता या पंचवार्षीकच्या शेवटी धडगावला बैठक घेण्यात आली. अशा बैठकीतून काय निष्पन्न होते याबाबत मात्र, पदाधिकारी व सदस्यही अनभिज्ञ आहेत.