शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षित जिल्ह्यांच्या डेल्टा रँकिंगच्या शैक्षणिक विकासात देशात जिल्हा दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर दंतेवाडा, तिसऱ्या, बस्तर चौथ्या आणि आसाममधील बक्सा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे. शिक्षण या उपक्रमांतर्गत एकूण आठ निर्देशांकापैकी शिक्षण विभागाने सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. पाचवी ते सहावीतील संक्रमणदर ९९.५६ टक्के असून आठवी ते नववी वर्गातील संक्रमणदर ९३.३३ टक्के आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थी दूर जाणार नाही म्हणून वैयक्तिक लक्ष देण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे.

एप्रिल २०१८ मध्ये ७७.११ टक्के असलेली मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या जानेवारी २०२१ मध्ये ९२.९३ टक्क्यांवर आली आहे. यासाठी आकांक्षित जिल्हा निधीतून ६५ स्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ५०६ शाळांची रंगरंगोटी करण्यात आली असून १४८ वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ६० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. एकूण १५६ शाळांमधील ३१५ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ३१५ शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासरूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

३८४ शाळांमध्ये सोलर डिजिटल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

१५ ते ४५ वयोगटातील स्त्री साक्षरतेसंदर्भात एप्रिल २०१८ मध्ये ४६.१० असणारे प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ८१.८१ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थी-शिक्षक संदर्भात असलेले ९३.१५ टक्के प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ९८.७८ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानीत शाळांमधील पहिली ली ते आठवी

वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली प्रगती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दुर्गम भागातील

शाळांमध्ये अधिक चांगल्या सुविधा करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचेदेखील मार्गदर्शन लाभले आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीदेखील जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.