शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

आकांक्षित जिल्ह्यांच्या डेल्टा रँकिंगच्या शैक्षणिक विकासात देशात जिल्हा दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर दंतेवाडा, तिसऱ्या, बस्तर चौथ्या आणि आसाममधील बक्सा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे. शिक्षण या उपक्रमांतर्गत एकूण आठ निर्देशांकापैकी शिक्षण विभागाने सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. पाचवी ते सहावीतील संक्रमणदर ९९.५६ टक्के असून आठवी ते नववी वर्गातील संक्रमणदर ९३.३३ टक्के आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थी दूर जाणार नाही म्हणून वैयक्तिक लक्ष देण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे.

एप्रिल २०१८ मध्ये ७७.११ टक्के असलेली मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या जानेवारी २०२१ मध्ये ९२.९३ टक्क्यांवर आली आहे. यासाठी आकांक्षित जिल्हा निधीतून ६५ स्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ५०६ शाळांची रंगरंगोटी करण्यात आली असून १४८ वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ६० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. एकूण १५६ शाळांमधील ३१५ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ३१५ शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासरूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

३८४ शाळांमध्ये सोलर डिजिटल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

१५ ते ४५ वयोगटातील स्त्री साक्षरतेसंदर्भात एप्रिल २०१८ मध्ये ४६.१० असणारे प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ८१.८१ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थी-शिक्षक संदर्भात असलेले ९३.१५ टक्के प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ९८.७८ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानीत शाळांमधील पहिली ली ते आठवी

वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली प्रगती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दुर्गम भागातील

शाळांमध्ये अधिक चांगल्या सुविधा करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचेदेखील मार्गदर्शन लाभले आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीदेखील जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.