शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब तपासणीत जिल्हा दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबईसारख्या हाय रिस्क भागातून आलेल्या सात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे १०५ अहवाल धुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुंबईसारख्या हाय रिस्क भागातून आलेल्या सात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे १०५ अहवाल धुळे येथील प्रयोग शाळेने वेटींगवर ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हा प्रशासनाने याबाबत धुळे प्रयोगशाळेकडे पाठपुरावा केला आहे.हायरिस्क भागातून आलेल्या रुग्णांमुळे संपर्कातील इतरांना लागण होण्याची शक्यता जास्त असल्याची भिती आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे काही जणांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले असून संबधितांच्या रहिवास क्षेत्राकडेही लक्ष ठेवण्यात आले आहे. शिवाय अशा लोकांकडून त्यांची संपर्क साखळीचीही माहिती आधीच घेवून ठेवण्यात आली आहे.रजाळे येथील सहाजण मुंबई रिटर्न आहेत. ते हाय रिस्क भागातून आलेले असल्यामुळे विशेष दक्षता घेतली जात आहे. तीन दिवसांपूर्वीचे ४२ व दोन दिवसांपूर्वीचे २८ आणि रविवारचे ३५ असे १०५ अहवाल वेटींगवर आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचेही अहवाल त्यात अडकले असल्याने जिल्हा रुग्णालयात चलबिचलता वाढली आहे.जळगाव, मालेगावला प्राधान्यधुळे येथील प्रयोगशाळेत जळगाव, मालेगाव व धुळे विभागातील सर्वाधिक स्वॅब येतात. हे भाग हायरिस्क झोनमध्ये आहेत. तेथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोनाचे निदान जलदगतीने व्हावे यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून संबधीत ठिकाणी उपाययोजना करता येणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याला प्राधान्य देता येते. त्यामुळे मालेगाव, जळगाव व धुळे येथील दररोज जास्तीत जास्त स्वॅब नमुने तपासण्याचे काम या प्रयोगशाळेत केले जात आहे.तीन दिवस: अहवाल नाहीगेल्या तीन दिवसात नंदुरबारचे एकही अहवाल प्राप्त झाले नाहीत. वास्तविक हायरिस्क भागातील कोरोना रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले असले तरी त्यांच्या स्वॅबचे नमुने काय येतात याबाबत आरोग्य विभागासह त्या त्या कुटूंबातील नातेवाईक आणि गावकरीही चिंतेत आहेत.नंदुरबार सिव्हीलकडून गुरुवारी रात्री ४२ स्वॅब पाठविण्यात आले होते. शुक्रवार व शनिवारी २८ तर रविवारी ३५ स्वॅब पाठविण्यात आले आहेत. तीन ते चार दिवसात एकुण १०५ स्वॅब पाठविण्यात आलेले आहेत. परंतु गुरुवारपासून एकाही स्वॅबचे अहवाल रविवारी रात्रीपर्यंत मिळालेले नव्हते.सोमवारी आणखी काही स्वॅब पाठविले जाणार आहेत. स्वॅब पाठविण्याचे प्रमाण कायम असले तरी येणाºया अहवालांची संख्या निरंक राहत असल्याने आरोग्य विभाग आणि सिव्हीलचे अधिकारीही हैराण झाले आहेत.बाहेरून येणाºयांचा ओघजिल्ह्यात बाहेरगावाहून येणाºयांचा ओघ सुरूच आहे. अनेक शहरी भागात बाहेरून येणारे कुठलीही माहिती देत नाही. वसाहतींमधील नागरिकही वाईटपणा नको म्हणून तक्रारी करीत नाहीत. यामुळे मात्र रिस्क वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह इतर भाग हायरिस्क म्हणून ओळखले जात आहे. सध्या रहदारीची सूट दिली जात आहे. सहज पास उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येणाºया-जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मात्र संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.बाहेर गावाहून येणाºयांनी कुठलीही माहिती न लपवता आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक लक्षणे दिसली तरच स्वॅब घेतले जातात किंवा क्वॉरंटाई केले जाते. अन्यथा सुचना देवून घरी पाठविले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाची अपेक्षा आहे.नवापूरच्या सिमेवरील गुजरातमधील उच्छल येथे आढळलेल्या रुग्णामुळे शहरात विशेष दक्षता घेतली जात आहे. रुग्ण महिलेच्या पतीचे नवापूरात हॉटेल असून तेथे नेहमीच गर्दी राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून रस्ते बंद केले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.