शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

राज्यापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे ...

नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कायम आहे. यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना मृत्युमुळे जिल्हा प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ घसरला आहे. दररोज १५ ते ३५ दरम्यान रुग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे अनेक खासगी कोरोना रुग्णालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा रुग्णालयातदेखील रुग्ण संख्या कमालीची कमी झाली आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर हा ०.४० टक्के आहे. राज्याचा मृत्युदर १.६२ असून नंदुरबार जिल्ह्याचा २.०२ इतका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा दर स्थिर आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

दररोज आढळणारे रुग्ण व मृत्यू संख्या यातील तफावत अगदीच कमी राहत आहे. गुरुवार, २७ मे रोजी तर दिवसभरात १७ कोरोना रुग्ण आढळून आले असतांना सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात तब्बल ३४९ इतके झाले आहेत. त्या खालोखाल शहादा तालुक्यात १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यात १५६, तळोदा तालुक्यात ७६, अक्कलकुवा तालुक्यात २४ तर धडगाव तालुक्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाबाहेरील ७८ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.