लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाच्या नागरी महानेट प्रकल्पांतर्गत येत्या काळात जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा आणि वसतीगृहे एकमेकांना जोडली जाऊन केवळ तेथील विविध माहिती एका क्लिकवर समोर येऊन कामकाज सुलभ होणार आहे़ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नंदुरबारात जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आला़उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकीय विभाग आणि त्यांच्या अखत्यारित असलेले १३९ कार्यालय, ५७ जिल्हा परिषदेच्या शाळा व ३० विद्यार्थी वसतीगृहे अशी २३५ ठिकाणे एकमेकांना जोडले जाणार आहेत़ नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर आॅप्टिक इंटरनेट सुविधेंतर्गत त्या-त्या ठिकाणांना उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे़यावेळी जिल्हा प्रकल्प व्यावस्थापक खैरनार यांनी योजनेतील फायदे तसेच सामान्यांसाठी होणाऱ्या लाभाची माहिती दिली़ शासकीय कार्यालय, शाळा व वसतीगृह यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़ जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दुर्गम भागातील धडगाव तालुक्याला याचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले़या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ई-गर्व्हनन्स, आरोग्य शिक्षण, ई-डेटा आदी उपक्रमांना गती येऊन त्यांचा दर्जा सुधारणार आहे़ नागरिकांना मिळणाºया दाखल्यांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे़
एका क्लिकवर जोडला जाणार जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:32 IST