शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे़ यातून आतापर्यंत ४५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून ५५ टक्के कर्जाचे वाटपही जूनमध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे़एप्रिल महिन्यापासून जिल्हा बँकेने कर्जाचे वाटप सुरु केले आहे़ यातून आजअखेरीस २७ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप झाले आहे़ जिल्ह्यात बँकेकडून विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत कर्जाचे वाटप करण्यात येते़ यातून आतापर्यंत २३५ पैकी १४५ संस्थांनी त्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज पुरवठा केल्याने शेतीकामांना वेग आल्याची माहिती आहे़ दरम्यान २ हजार ८४० खातेदारांना बँकेच्या जिल्ह्यातील २९ शाखांमधून कर्ज वाटप करण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत यंदा बँकेने कर्ज वाटपाला वेग दिला असल्याने शेतकºयांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोपे झाले आहे़ यंदा बँकेने शेतकºयांची गर्दी टाळण्यासाठी रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप केले आहे़ यातून शेतकºयांना विविध कार्यकारी संस्था आणि बँकेच्या शाखेतून मोबाईलवर मेसेज देऊन वाटप करण्यात आलेल्या कार्डच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कर्जाची माहिती मिळत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणात अडचणी येण्याची शक्यता शेतकºयांनी वर्तवली होती़ परंतू याउलट स्थिती सध्या आहे़दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमाफी योजनेसह २०१७ नंतरच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या याद्यांमध्ये नावे नसल्याने अनेक शेतकºयांना कर्ज मिळण्यास येणाºया अडचणी कायम आहेत़ मागील थकीत रक्कम जैसे थे असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत़ जिल्हा बँकेत गेल्या वर्षाच्या परतावा देणारे शेतकरी आणि संस्था यांना प्रथम प्राधान्याने कर्ज दिले जात आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत कर्जमागणी करणाºया शेतकºयांना नाहकरत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत असल्याने शासनाने कर्जमाफीच्या याद्या देऊन पीक कर्ज मिळण्याचा अडसर दूर करण्याची मागणी केली आहे़आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात ६० संस्था व १ हजार १९७, शहादा ५९ संस्था व १ हजार २३२ शेतकरी, तळोदा १० संस्था १२८ शेतकरी, अक्कलकुवा १ संस्था १८ शेतकरी तर नवापुर तालुक्यात १५ संस्था व २६५ सभासद शेतकरी यांना कर्ज देण्यात आले आहे़ शेतकºयांना देण्यात आलेल्या या कर्जामुळे जिल्ह्यातील ४ हजार ५४६ क्षेत्र संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती आहे़