शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत आहे. अनेक व्यापारी खेडा खरेदी करीत असून या खरेदीतून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्याचाच फायदा कापूस व्यापारी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत.

मध्य प्रदेश राज्यातील खेतिया येथे पाच हजार, सहा हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. मात्र, स्थानिक ठिकाणी येणारे व्यापारी ओला कापूस असल्याचे कारण दाखवत कोरड्या कापसालाही मनमानी भावाने खरेदी करीत आहेत. काही भागात अतिपावसामुळे कापसाचे पूर्णत: नुकसान झाले असून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. असे असताना महागडी खते, बियाणे व कीटकनाशकांचा खर्चदेखील शेतकऱ्यांचा निघेनासा झाला आहे. यंदा आधीच उशिरा पाऊस, त्यात दीड महिने पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर झालेला जास्त पाऊस या तिहेरी संकटांना यावर्षी शेतकरी सामोरा गेला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सोयाबीनही दहा हजारांवरून पाच हजारांवर

जिल्हाभरात सोयाबीन या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात आले नाही तोवर सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सोयाबीनला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परंतु, सद्य:स्थिती पाहता सोयाबीनचे दर पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कापसावर लाल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव

सारंगखेडासह परिसरात कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. सखल भागातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शासनाने या सर्व परिस्थितीची त्वरित दखल घेत शेतकऱ्यांना हेक्टरी अपेक्षित मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.