शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत आहे. अनेक व्यापारी खेडा खरेदी करीत असून या खरेदीतून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्याचाच फायदा कापूस व्यापारी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत.

मध्य प्रदेश राज्यातील खेतिया येथे पाच हजार, सहा हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. मात्र, स्थानिक ठिकाणी येणारे व्यापारी ओला कापूस असल्याचे कारण दाखवत कोरड्या कापसालाही मनमानी भावाने खरेदी करीत आहेत. काही भागात अतिपावसामुळे कापसाचे पूर्णत: नुकसान झाले असून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. असे असताना महागडी खते, बियाणे व कीटकनाशकांचा खर्चदेखील शेतकऱ्यांचा निघेनासा झाला आहे. यंदा आधीच उशिरा पाऊस, त्यात दीड महिने पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर झालेला जास्त पाऊस या तिहेरी संकटांना यावर्षी शेतकरी सामोरा गेला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सोयाबीनही दहा हजारांवरून पाच हजारांवर

जिल्हाभरात सोयाबीन या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात आले नाही तोवर सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सोयाबीनला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परंतु, सद्य:स्थिती पाहता सोयाबीनचे दर पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कापसावर लाल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव

सारंगखेडासह परिसरात कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. सखल भागातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शासनाने या सर्व परिस्थितीची त्वरित दखल घेत शेतकऱ्यांना हेक्टरी अपेक्षित मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.