शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत आहे. अनेक व्यापारी खेडा खरेदी करीत असून या खरेदीतून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्याचाच फायदा कापूस व्यापारी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत.

मध्य प्रदेश राज्यातील खेतिया येथे पाच हजार, सहा हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. मात्र, स्थानिक ठिकाणी येणारे व्यापारी ओला कापूस असल्याचे कारण दाखवत कोरड्या कापसालाही मनमानी भावाने खरेदी करीत आहेत. काही भागात अतिपावसामुळे कापसाचे पूर्णत: नुकसान झाले असून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. असे असताना महागडी खते, बियाणे व कीटकनाशकांचा खर्चदेखील शेतकऱ्यांचा निघेनासा झाला आहे. यंदा आधीच उशिरा पाऊस, त्यात दीड महिने पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर झालेला जास्त पाऊस या तिहेरी संकटांना यावर्षी शेतकरी सामोरा गेला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सोयाबीनही दहा हजारांवरून पाच हजारांवर

जिल्हाभरात सोयाबीन या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात आले नाही तोवर सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सोयाबीनला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परंतु, सद्य:स्थिती पाहता सोयाबीनचे दर पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कापसावर लाल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव

सारंगखेडासह परिसरात कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. सखल भागातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शासनाने या सर्व परिस्थितीची त्वरित दखल घेत शेतकऱ्यांना हेक्टरी अपेक्षित मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.