शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

किरकोळ कारणातून उद्भवलेेले वाद जातात संसार मोडण्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी ...

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी होताना दिसत नाहीत. किरकोळ वादात दोन्ही बाजूकडून ताणून धरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी पोलीस दलातील भरोसा सेलमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न होतो. त्यात चांगले यशही मिळते, पण काही प्रकरणात थेट गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र आहे.

अगदी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये संघर्ष सुरू होत असतो. त्यातून त्यांच्यात हाणामारीपर्यंत वेळ येते. काही दिवस दोघांचा अबोला असतो. माघार घेणार कोण, असा मुद्दा पुढे आल्यानंतर, आम्हाला सोबत राहायचेच नाही, इथंपर्यंत त्यांची गोष्ट येते. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये आल्यानंतर दोघांचेही समुपदेशन केले जाते. सेलच्या प्रयत्नांना काही वेळेस यश येते. सेलमधील कर्मचारी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वाद अगदीच विकोपाला गेलेले असल्यामुळे नाईलाजाने गुन्हे दाखल होतात. इगो दुखावतो आणि वाद वाढतात...

n आजकाल एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळे घरात कुणी ज्येष्ठ मंडळी नसतात. अशावेळी पती-पत्नीत वाद झाला, तर त्यांना समजाविण्यासाठी कुणी नसते. अशावेळी दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही आणि वाद वाढत जातो. परिणामी कुटुंब दुभंगण्यापर्यंत वाद जातो. त्यामुळे दोघांपैकी एकाने इगो बाजूला ठेवून समंजसपणा दाखवला, तर तुटणारे संसार वाचतील. अगदी किरकोळ वादाचे स्वरूप हे पोलीस ठाण्यापर्यंत जाते.

समंजसपणा दाखवा

n घरात, कुटुंबात वाद झाला, तर तो अंतर्गत मिटवा. एकमेकांमध्ये समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे.

n काही वेळा विवाहितेला पैशासाठी, माहेरून वस्तू आणण्यासाठी त्रास दिला जातो. अशाबाबतीत गुन्हे दाखल होतात.

n यासाठी हुंडाविरोधी कायदा सक्षम आणि शिक्षेच्यादृष्टीने पुरेसा आहे. याबाबत कुटुंबामध्ये सुसंवाद आवश्यक आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे भरोसा सेल

n जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सेल अर्थात भरोसा सेल हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आलेल्या अर्जानंतर दोन्ही बाजूकडील मंडळींना बोलावून समुपदेशन केले जाते व समजाविण्याचा प्रयत्न होतो.