शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणातून उद्भवलेेले वाद जातात संसार मोडण्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी ...

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी होताना दिसत नाहीत. किरकोळ वादात दोन्ही बाजूकडून ताणून धरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी पोलीस दलातील भरोसा सेलमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न होतो. त्यात चांगले यशही मिळते, पण काही प्रकरणात थेट गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र आहे.

अगदी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये संघर्ष सुरू होत असतो. त्यातून त्यांच्यात हाणामारीपर्यंत वेळ येते. काही दिवस दोघांचा अबोला असतो. माघार घेणार कोण, असा मुद्दा पुढे आल्यानंतर, आम्हाला सोबत राहायचेच नाही, इथंपर्यंत त्यांची गोष्ट येते. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये आल्यानंतर दोघांचेही समुपदेशन केले जाते. सेलच्या प्रयत्नांना काही वेळेस यश येते. सेलमधील कर्मचारी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वाद अगदीच विकोपाला गेलेले असल्यामुळे नाईलाजाने गुन्हे दाखल होतात. इगो दुखावतो आणि वाद वाढतात...

n आजकाल एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळे घरात कुणी ज्येष्ठ मंडळी नसतात. अशावेळी पती-पत्नीत वाद झाला, तर त्यांना समजाविण्यासाठी कुणी नसते. अशावेळी दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही आणि वाद वाढत जातो. परिणामी कुटुंब दुभंगण्यापर्यंत वाद जातो. त्यामुळे दोघांपैकी एकाने इगो बाजूला ठेवून समंजसपणा दाखवला, तर तुटणारे संसार वाचतील. अगदी किरकोळ वादाचे स्वरूप हे पोलीस ठाण्यापर्यंत जाते.

समंजसपणा दाखवा

n घरात, कुटुंबात वाद झाला, तर तो अंतर्गत मिटवा. एकमेकांमध्ये समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे.

n काही वेळा विवाहितेला पैशासाठी, माहेरून वस्तू आणण्यासाठी त्रास दिला जातो. अशाबाबतीत गुन्हे दाखल होतात.

n यासाठी हुंडाविरोधी कायदा सक्षम आणि शिक्षेच्यादृष्टीने पुरेसा आहे. याबाबत कुटुंबामध्ये सुसंवाद आवश्यक आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे भरोसा सेल

n जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सेल अर्थात भरोसा सेल हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आलेल्या अर्जानंतर दोन्ही बाजूकडील मंडळींना बोलावून समुपदेशन केले जाते व समजाविण्याचा प्रयत्न होतो.