शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

किरकोळ कारणातून उद्भवलेेले वाद जातात संसार मोडण्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी ...

नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी होताना दिसत नाहीत. किरकोळ वादात दोन्ही बाजूकडून ताणून धरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी पोलीस दलातील भरोसा सेलमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न होतो. त्यात चांगले यशही मिळते, पण काही प्रकरणात थेट गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र आहे.

अगदी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये संघर्ष सुरू होत असतो. त्यातून त्यांच्यात हाणामारीपर्यंत वेळ येते. काही दिवस दोघांचा अबोला असतो. माघार घेणार कोण, असा मुद्दा पुढे आल्यानंतर, आम्हाला सोबत राहायचेच नाही, इथंपर्यंत त्यांची गोष्ट येते. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये आल्यानंतर दोघांचेही समुपदेशन केले जाते. सेलच्या प्रयत्नांना काही वेळेस यश येते. सेलमधील कर्मचारी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वाद अगदीच विकोपाला गेलेले असल्यामुळे नाईलाजाने गुन्हे दाखल होतात. इगो दुखावतो आणि वाद वाढतात...

n आजकाल एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळे घरात कुणी ज्येष्ठ मंडळी नसतात. अशावेळी पती-पत्नीत वाद झाला, तर त्यांना समजाविण्यासाठी कुणी नसते. अशावेळी दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही आणि वाद वाढत जातो. परिणामी कुटुंब दुभंगण्यापर्यंत वाद जातो. त्यामुळे दोघांपैकी एकाने इगो बाजूला ठेवून समंजसपणा दाखवला, तर तुटणारे संसार वाचतील. अगदी किरकोळ वादाचे स्वरूप हे पोलीस ठाण्यापर्यंत जाते.

समंजसपणा दाखवा

n घरात, कुटुंबात वाद झाला, तर तो अंतर्गत मिटवा. एकमेकांमध्ये समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे.

n काही वेळा विवाहितेला पैशासाठी, माहेरून वस्तू आणण्यासाठी त्रास दिला जातो. अशाबाबतीत गुन्हे दाखल होतात.

n यासाठी हुंडाविरोधी कायदा सक्षम आणि शिक्षेच्यादृष्टीने पुरेसा आहे. याबाबत कुटुंबामध्ये सुसंवाद आवश्यक आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे भरोसा सेल

n जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सेल अर्थात भरोसा सेल हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आलेल्या अर्जानंतर दोन्ही बाजूकडील मंडळींना बोलावून समुपदेशन केले जाते व समजाविण्याचा प्रयत्न होतो.