शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

वादग्रस्त विषयांमुळे सभा तहकूब झाल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अपरिहार्य कारणामुळे तळोदा नगरपालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अपरिहार्य कारणामुळे तळोदा नगरपालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले तरी विषय पत्रिकेवरील काही वादग्रस्त विषयांवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत होते. त्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी १० वाजेला पालिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पालिकेने सभागृहात होणारी सभा प्रांगणात आयोजित केली होती. त्यासाठी मंडप टाकून अंतर राखत व्हीलचेअरर्सदेखील लावल्या होत्या. सभेतील अजेंड्यावर तब्बल ५४ विषय घेण्यात आले होते. यात पालिकेच्या मोकळ्या जागांवर बगीचा विकसीत करणे, चौक सुशोभिकरण करणे, काही ठिकाणी रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण करणे, पालिकेच्या गाळ्यांचे अधिमूल्य निश्चित करणे, पालिका हद्दीतील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, नोटा मोजणी मशीन खरेदी करणे, नवीन प्रशासकीय इमारतीत पाईप लाईन, कुपनलिका करणे, त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून सुरक्षा उपकरणे व अनुषंगीक साहित्य खरेदी करणे या विषयांव्यतिरिक्त देवेंद्र हिरालाल बागुल यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर बियर बारला ना हरकत दाखला देणे, जितेंद्र दुबे यांच्या घरासमोरील अस्तित्वात असलेली मुतारी इतरत्र हलवून शहराजवळील बायोडिझेल पंपास एनओसी देणे अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होता. तथापि, शुक्रवारी सकाळी १० वाजेला सुरू होणारी सभा तब्बल पावणे अकरा वाजेपावेतो सुरु झाली नाही. शेवटी सभेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी काही अपरिहार्य कारणामुळे सभा तहकूब केली. परंतु सभेसाठी एवढी सुसज्ज तयारी करण्यात आल्यानंतर तळोदेकरांमध्ये सभेबाबत कुतूहल होते. सभेतील तीन विषयांवर सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांमध्येच आपसात मोठे मतभेद होते. आपसातील हे वाद जगजाहीर होऊ नये म्हणून सभा तहकूब करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.

बियरबारच्या परवानास ना हरकत देण्याबरोबरच शहराजवळील नवीन बायोडिझेल पंपासही नाहरकत देणे शिवाय खान्देशी गल्लीच्या तोंड्यावरील शौचालय इतरत्र हलविणे. या प्रमुख तीन विषयांवर सत्ताधारी भाजपा नगरसेवकामध्येच मतभेद होते. काही ठरावाच्या बाजूने तर काहीचा विरोध होता. त्यामुळे या वादग्रस्त विषयांवर सभा गाजणार होती. याबाबत आदल्या दिवशी एका गटाकडून रणनितीही आखण्यात आली होती. ही बाब प्रत्यक्ष आमदार राजेश पाडवी यांच्या कानावर आल्यामुळे त्यांनी तडक सत्ताधारी नगरसेवकांमध्ये संवाद साधला. नगरसेवकांनी त्यांच्यापुढेदेखील आपसातील रूसवे-फुगवे कथन केले. या पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्यानंतर शेवटी नगराध्यक्षांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.पालिकेची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजेला आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे विरोधी काँग्रेसचे सर्वच नगरसेवक सभास्थळी हजर झाले होते. मात्र भाजपाचे एकही नगरसेवक सभास्थळी फिरकला नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगली तयारी केली असल्यामुळे सर्व तयारीनिशी आले होते. १० वाजेची सभा तब्बल १०.४० लादेखील सुरू होवू शकली नाही म्हणून गटनेते गौरव वाणी यांनी पालिका प्रशासनानस सभा चालू होण्याबाबत विचारले तेव्हा सभा काही अपरिहार्य कारणामुळे तहकूब करण्यात आल्याचे त्यांना प्रशासनाने सांगितले.शुक्रवारी होणाºया पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी बाहेरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामुळे पालिकेस एखाद्या छावणीचेच स्वरूप आले होते. स्वत: उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी विक्रम कदम तळोद्यात हजर होते. त्यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता जरी बं’ोबस्ताची मागणी पालिकेने केली नव्हती. परंतु पालिकेची सभा वादळी ठरण्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळेच अतिरिक्त बंदोबस्त मागविल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष असतात. सभेबाबत ते निर्णय घेऊ शकतात. शुक्रवारची सर्व साधारण सभा तहकूब करण्याचे पत्र त्यांनीच दिल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली होती.-सपना वसावा,मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदाकोरोना महामारीने तालुक्यातही धडक दिली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शुक्रवारची पालिकेची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात याच विषयांवर सभा घेण्यात येईल.-अजय परदेशी,नगराध्यक्ष, नगरपालिका, तळोदाअजेंड्यावरील दोन-तीन विषय सोडले तर सर्वच विषय विकासाचे होते. वादातील विषय टळू शकले असते. परंतु त्याच्यासाठी सभा तहकूब करणे म्हणजे विकास कामांना खीळ घालणे. काँग्रेस नगरसेवकांनी अडीच वर्षामध्ये विकास कामांना कधीच विरोध केला नाही. सभा तहकूब करणे म्हणजे विकास कामांनाही अडथळा बसतो.-गौरव वाणी,गटनेते काँग्रेस, नगरपालिका, तळोदा