शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

दोन दिवसात दोन वर्षाच्या हिशोबावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायतीत ४ कोटी ७५ लाख रुपयांचा गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर  ९ जणांची चाैकशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायतीत ४ कोटी ७५ लाख रुपयांचा गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर  ९ जणांची चाैकशी सुरू आहे. बुधवारी पहिल्या दिवशी अपूर्ण असलेली चाैकशी गुरुवारीही अपूर्ण राहिली असून या दोन दिवसात केवळ २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षातील गैरव्यवहाराची चाैकशी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्याकडून अक्कलकुवा शहरातील विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे केल्या गेल्या होत्या. यातून मे २०२० मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा यांनी चार सदस्यीय चाैकशी समिती स्थापन करून गैरव्यवहाराचा तपास करण्याचे आदेश दिले होते. या समितीने तीन महिने चाैकशी करून तयार केलेला ३१ पानी अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला होता. या अहवालात विद्यमान सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, माजी सरपंच उषाबाई प्रवीण बोरा, उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, माजी सरपंच अमरसिंग हुपा वळवी, प्रशासक आर.एम. देव, जे.एस. बोराळे, ग्रामसेवक व्ही.बी. जाधव, आनंदा पाडवी, एस.आर. कोळी यांना नोटिसा देत खुलासे देण्याचे आदेश दिले होते. यानंतर संबधितांनी खुलासे सादर करत या प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान चार कोटी ७५ लाख रुपयांचा गैरव्यवहार स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषदेने त्यांना पुन्हा नोटिसा देत जिल्हा परिषदेत चाैकशीसाठी येण्याचे आदेश काढले होते. या चाैकशीच्या पहिल्या दिवशी सर्व ९ जणांची तीन विस्तार अधिकारी चाैकशी करत असल्याची माहिती देण्यात आली होती. पहिल्या दिवशी अपूर्ण असलेली चाैकशी गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात आली होती. यातून बुधवार आणि गुरुवारी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील हिशेब नसलेल्या निधीचे पुरावे संबंधितांकडून मागण्यात आले आहेत. याबाबत त्यांनी खुलासे सादर केले. गुरुवारी सायंकाळी अपूर्ण असलेली चाैकशी आता शनिवारी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ग्रामपंचायत प्रभागरचना कार्यक्रमाची धावपळ असल्याने चाैकशी करणारे तीनही विस्तार अधिकारी उपलब्ध होणार नसल्याने शनिवारी चाैकशी करून ती पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान शनिवारी २०१८-१९ व २०१९-२०२० या वर्षातील विकासकामांची मान्यता, निधी खर्च, ई टेंडरिंग, ग्रामसेवकांचे दप्तर, विकास कामांसाठी नियुक्त केलेले ठेकेदार, संस्था यांची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारीही सर्व ९ जणांनी खुलासेच सादर केल्याची खात्रीलायक माहिती देण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ग्रामसेवकांच्या दप्तरात अद्यापही तफावत असल्याचे दिसून येत असल्याचे समोर आले आहे.