शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीची 51 वर्षाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:52 IST

असलोद-सप्तश्रृंगी दिंडी 29 पासून : प्रकाशातील त्रिवेणी संगमावर विधी

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद ते सप्तशृंगी गड पायी दिंडी कावड यात्रा यावर्षीदेखील काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा असलोदहून 29 सप्टेंबर रोजी वणी गडाकडे प्रस्थान करणार असल्यानेही पदयात्रा गेल्या 51 वर्षापासून अखंडितपणे सुरू असल्याने पदयात्रेला महत्त्व आले आहे.या पायी कावड दिंडीची सुरूवात ब्रrालिन मधुसूदन पाठक (नाना बाबा) यांनी केली होती. ती अद्यापर्पयत अखंडपणे सुरू आहे. यावर्षीदेखील प्रकाशा येथील त्रिवेणी संगमावरून पवित्र तीर्थ आणून मंदिरात पूजा अर्चा करून 27 सप्टेंबर रोजी सकाळी असलोदकडे प्रयाण करणार असून, असलोदहून ही दिंडी 29 रोजी गडाकडे प्रस्थान करणार आहे. यात चिरखान, कोंढावळ, सारंगखेडा, दोंडाईचा, इंदवे, दुसाणे, साक्री, दिघावे, ताराहाबाद, विरगाव, बेज मार्गे नांदुरी गडावर सात दिवसाच्या पायी यात्रेद्वारे पोहणार आहे. दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी कोजागीरी पौर्णिमा असल्याने रात्री नऊ वाजता सप्तशृंगी देवीची शास्त्रोक्त व वेदोक्त मंत्रोपचारात कावडीद्वारे आणलेल्या पवित्र          तीर्थाने अभिषेक करण्यात येणार आहे.ही पदयात्रा अतिशय नियोजन बद्ध व शिस्तीत निघत असून, यात तीन हजार पेक्षा अधिक भाविक सहभागी होत असतात. या पायी कावड दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदात्यांकडून भाविकांना सहकार्य मिळत असते. तसेच कावड पदयात्रेत भावगीत, भजन, भारूडासह            सप्तशती पाठाचे वाचन करून भाविकांमध्ये उत्साह वाढवतात. या पद यात्रींचा पोशाखा हा पांढरे धोतर, पायजमा, शर्ट व लाल रूमा असा निश्चित केला जातो. या वेळी          सहभागी होणा:या भाविकांना मंडळातर्फे विविध सूचना दिल्या जातात.या पदयात्रेला गडावर महत्त्व प्राप्त झाले असून, पदयात्रेला शाम दिनकर जाधव यांचे विशेष सहकार्य लाभते. पदयात्रा यशस्वितेसाठी सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळाचे अध्यष धर्मा शिंदे, सचिव उद्धव पाटील, दिलीप राजभोज, भटू पाठक, जगदीश पाटीलसह मंडळाचे सदस्य प्रय}शिल राहतात.