शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कोरोनाबाधितांना मधुमेह अन् रक्तदाब नेतोय मृत्यूच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण ५६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण शरीरात अधिक तीव्रतेने होऊन व्याधी बळावल्याने हे मृत्यू ...

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण ५६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण शरीरात अधिक तीव्रतेने होऊन व्याधी बळावल्याने हे मृत्यू झाले असले तरी याला रक्तदाब व मधुमेहासारखे आजार सहाय्यकारी ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे दुर्धर आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दुपटीने वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात नियंत्रणात असलेला कोरोना अचानक वाढीस लागल्याने पाच मार्चनंतर मृत्यूंची संख्या वाढीस लागली होती. यातून दर दिवशी पाचपेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येत होते. यात वृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मृत्यूत मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन यासह दुर्धर व दीर्घ आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत होते. आधीच व्याधी असताना काळजी न घेतल्याने कोरोनाचा विषाणू फुफ्फुसामध्ये वाढीस लागल्याने मृत्यू ओढावल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये समोर आले आहे. वेळाेवेळी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेत मृत्यूची कारणे समोर आणण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून दुर्धर आजार असलेल्यांना बाधा झाल्यानंतर सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

अतिजाेखमीच्या व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ शकणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन, हृरदयरोगी, दुर्धर आजारी, कॅन्सरग्रस्त, एचआयव्ही बाधित, टीबीग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाने काळजी कशी घ्यावी याबाबत सूचना केल्या आहेत. या रुग्णांनी बाधा होण्याची शक्यता असल्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन कामकाज करावे, असे सांगण्यात आले आहे. विविध आजारांवर उपचार घेत असतानाही काळजी घेत, सातत्याने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत औषधी घ्याव्यात, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची मेडिकल हिस्ट्री माहिती करून घेत उपचार केले जात आहेत. रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करून समुपदेशनही करण्यात येत आहे. आजार बळावू नये यासाठी प्रयत्न आहे.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.