शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

वाढत्या तापमानाने शेतशिवारे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:02 IST

ग्रामस्थ बेजार : ग्रामीण भागातील जनजीवनावर होतोय परिणाम

तळोदा : गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे़ याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसून येत आहे़ दुपारच्या वेळी चांगलेच तापत असल्याने शेतशिवारे ओस पडलेली दिसून येत आहेत़गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये़ त्यामुळे शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी शेतात काम करणेही अवघड होऊन बसले आहे़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ परंतु दुपारी १२ वाजेपासून तर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे शेतातही शुकशुकाट दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे शेतात काम करण्याचीही इच्छा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ शेतात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाढत्या तापमानाचा जनावरांवरही मोठा परिणाम होताना दिसून येत आहे़ तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरेसुध्दा शेतात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे़ जनावरांसाठीही शेतकºयांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ वातावरणात आद्रता वाढली असल्याने जीवाची लाही लाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकºयांना आपल्या शेतात निवाºयाचीही उभारणी केली आहे़ दुपारच्या वेळी याच निवाºयात शेतकºयांकडून काही काळ आराम करण्यात येत असतो़