शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळचा विकास कल्पना नुसती कल्पनाच ठरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

सातपुडा पर्वत रांगेत अतिदुर्गम भागात समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार १०० मीटर उंचीवर नैसर्गिकरित्या धडगाव तालुक्यात तोरणमाळ वसलेले आहे. या ...

सातपुडा पर्वत रांगेत अतिदुर्गम भागात समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार १०० मीटर उंचीवर नैसर्गिकरित्या धडगाव तालुक्यात तोरणमाळ वसलेले आहे. या क्षेत्राची धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून ख्याती असल्याने या क्षेत्राचा समावेश राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून झालेला आहे. दुर्दैवाने शासन कुठल्याही पक्षाचे असो शासनाची निष्क्रिय भूमिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे या भागाचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान दिलेले असतानाही केवळ साधन सुविधा नसल्याने या भागाकडे पर्यटकांचा ओढा अत्यल्प आहे. ज्या तुलनेत या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या तुलनेत या भागाची ख्याती देशपातळीवर नसल्याने हे क्षेत्र सातत्याने दुर्लक्षित ठरले आहे.

‘नेहमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दोन-तीन वर्षांतून तोरणमाळ विकासाच्या वल्गना केल्या जातात. विकासाची स्वप्ने दाखविली जातात. मात्र, प्रत्यक्षात विकास झालेला नसल्याने निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ख्याती असलेले तोरणमाळ नावडतीचे मीठ आळणी अथवा नावडतीचा पुत्र म्हणून सातत्याने दुर्लक्षित आहे. तसे पाहिले तर राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री म्हणून आमदार डॉ. विजयकुमार गावीत व आमदार जयकुमार रावल यांनी या भागाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. लोटस नामक एका खाजगी कंपनीमार्फत सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून विकास आराखडा राज्य शासनाला सादर केला होता. तर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. जयंतराव गायकवाड यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी भरती झाल्यानंतर त्यांनीही या विभागाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. मात्र, नेमकी माशी कुठे शिंकली, हे पर्यटनमंत्री व सचिव यांनी सादर केलेले विकास आराखडे कुठे हरवले, हेच कळेनासे झाले. परिणामी, आजही हा भाग विकासापासून कोसो किलोमीटर दूर आहे.

मागील महिन्यात तोरणमाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, शिवसेनेचे नंदुरबार-धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन स्वतंत्र बैठकीत चौकशी केली. या बैठकीनंतर सुमारे ५१७ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला असून, याला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निधीची तरतूद झाल्यावर या भागात विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुखांनी दिली. नेमका विकास आराखड्यात या भागातील भौगोलिक क्षेत्रासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा नाही पर्यटकांसाठी नेमके काय करणे गरजेचे आहे. रोजगार वाढीसह येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे वन संपत्तीचे जतन करून वन्यप्राण्यांना संरक्षण देत त्याची माहिती देशातील पर्यटकांना व्हावी याचाही समावेश या आराखड्यात असणे आवश्यक आहे. तरच या भागाचा विकास जलद गतीने होणे शक्य आहे अन्यथा गेल्या ३० वर्षांपासून राज्य शासन मंत्री व लोकप्रतिनिधी या भागाच्या विकासाची स्वप्ने जिल्ह्यातील नागरिकांना दाखवत आहे. नेहमीप्रमाणे आताही विकासाची कल्पना ही कल्पनाच ठरू नये, एवढीच अपेक्षा.