शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शेतीला तंत्रज्ञानाची जोड देवून विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतील स्थानिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती विकास करीत शेतकऱ्यांच्या उत्पनात भर घालण्यासाठी कवयित्री बहिणाबाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतील स्थानिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती विकास करीत शेतकऱ्यांच्या उत्पनात भर घालण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने जिल्ह्यात सी-लेज उपक्रम सुरू केला आहे. यासाठी नवापूर तालुक्यातील चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. या कामांची पहाणी करणे आणि त्याद्वारे संशोधन करण्यासाठी मुंबईचे पथक नंदुरबारात दाखल झाले आहे.विद्यापीठाने संशोधनाला प्राधान्य देवून त्याद्वारे विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे महत्वाचे सहकार्य मिळत आहे. शहरातून गावात हा मुख्य उद्देश असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील खांडबारा, शितलपाडा, नगाव व बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये आधीपासूनच कृषी विज्ञान केंद्र, बायफ, बीआरसी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम व कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन करून त्यांना समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता या कामांना मुंबईच्या १२ प्राध्यापक व २४ संशोधक विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळणार असून ते रविवारी या गावांमधील कामांची पहाणी करून अभ्यास करणार आहेत. त्यातून तयार होणाºया संशोधनातून गावांना आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न होणार आहे. शेती विकासातून शेतकरी व ग्रामविकास हा प्रमुख उद्देश त्यामागे आहे. बाहेरच्या लोकांनी येवून काम करण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच कामे केली पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत तेवढी बाहेरून घेतली जावी हा उद्देश देखील त्यामागे आहे.बैठकांमधून मार्गदर्शन... मुंबईचे १२ प्राध्यपक व २४ संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारी कृषी विज्ञान केंद्रात विविध बाबींची पहाणी केली. शिवाय बैठकांमधून मार्गदर्शन देखील केले. माहितीची देवान-घेवान करण्यात आली. रविवारी हे पथक चारही गावांमध्ये जावून पहाणी करणार आहे. त्यांच्यासोबत स्थानिक शास्त्रज्ञही राहणार आहेत. शुक्रवारी पथकाने साक्री तालुक्यातील आदर्श गाव बारीपाडा येथे दिवसभर थांबून स्थानिक लोकांनी केलेल्या कृषी, जलसंधारण, पीक नियोजन याची पहाणी केली.