शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

By admin | Updated: February 6, 2017 00:15 IST

तोरणमाळ : विद्याथ्र्याच्या सहली व पर्यटकांची गर्दी, सोयी उपलब्ध करून देण्याची गरज

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी राहते. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून अनेक कुटुंबे येतात. मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यटक तोरणमाळ येथे येतात. आठवडय़ाच्या शेवटी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सहलीचे आयोजन करून विद्याथ्र्याना निसर्गरम्य वातावरण व भौगोलिक माहिती व्हावी यासाठी घेऊन येत आहेत. काही पर्यटक धुळे, नाशिक, गुजरात आदी ठिकाणांहून कुटुंबांसह येऊन या निसर्गरम्य ठिकाणी रमताना दिसून येतात.तोरणमाळ येथील सातपायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या परिसरातील सीताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छिंद्रनाथ गुंफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी पर्यटक कुटुंबांसह वनभोजनाचा आनंद घेतात. यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह ज्येष्ठ मंडळीही तोरणमाळला अधिक पसंती देताना दिसून येते. या नयनरम्य ठिकाणासह येथील गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना फळे, फुले विकून रोजगार उपलब्ध होत आहे.या ठिकाणी येणा:या पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास अजून संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याने संबंधित विभागाने या ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.निसर्गाने सातपुडा पर्वत रांगेत मनाला मोहून टाकेल एवढे मोठे नयनरम्य देखावे दिले आहेत. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.     -अनिल पाटील, पर्यटक, धुळेमहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.    -मोहित ठाकरे, पर्यटक, शहादाविश्रांतीगृह व ओटय़ांची दुरवस्थामहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विश्रांतीगृहांची व बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओटय़ांची अवस्थाही वाईट झाली आहे. या ओटय़ाच्या फरशा निघालेल्या आहेत, पत्रेदेखील तुटलेले आहेत. परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी गाजावाजा करीत वृक्षारोपण केल्यानंतर लक्ष न दिल्याने रोपे सुकलेल्या अवस्थेत दिसून येतात.