शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

By admin | Updated: February 6, 2017 00:15 IST

तोरणमाळ : विद्याथ्र्याच्या सहली व पर्यटकांची गर्दी, सोयी उपलब्ध करून देण्याची गरज

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी राहते. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून अनेक कुटुंबे येतात. मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यटक तोरणमाळ येथे येतात. आठवडय़ाच्या शेवटी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सहलीचे आयोजन करून विद्याथ्र्याना निसर्गरम्य वातावरण व भौगोलिक माहिती व्हावी यासाठी घेऊन येत आहेत. काही पर्यटक धुळे, नाशिक, गुजरात आदी ठिकाणांहून कुटुंबांसह येऊन या निसर्गरम्य ठिकाणी रमताना दिसून येतात.तोरणमाळ येथील सातपायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या परिसरातील सीताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छिंद्रनाथ गुंफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी पर्यटक कुटुंबांसह वनभोजनाचा आनंद घेतात. यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह ज्येष्ठ मंडळीही तोरणमाळला अधिक पसंती देताना दिसून येते. या नयनरम्य ठिकाणासह येथील गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना फळे, फुले विकून रोजगार उपलब्ध होत आहे.या ठिकाणी येणा:या पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास अजून संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याने संबंधित विभागाने या ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.निसर्गाने सातपुडा पर्वत रांगेत मनाला मोहून टाकेल एवढे मोठे नयनरम्य देखावे दिले आहेत. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.     -अनिल पाटील, पर्यटक, धुळेमहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.    -मोहित ठाकरे, पर्यटक, शहादाविश्रांतीगृह व ओटय़ांची दुरवस्थामहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विश्रांतीगृहांची व बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओटय़ांची अवस्थाही वाईट झाली आहे. या ओटय़ाच्या फरशा निघालेल्या आहेत, पत्रेदेखील तुटलेले आहेत. परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी गाजावाजा करीत वृक्षारोपण केल्यानंतर लक्ष न दिल्याने रोपे सुकलेल्या अवस्थेत दिसून येतात.