शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

ट्रक टर्मिनस होऊनही नंदुरबारात जड वाहतूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रक टर्मिनसचे काम पुर्ण झाल्यामुळे ते येत्या 26 जानेवारीपासून पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असली तरी शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरित्या याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वीच शहरात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत जड वाहनांना बंदी असली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रक टर्मिनसचे काम पुर्ण झाल्यामुळे ते येत्या 26 जानेवारीपासून पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असली तरी शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरित्या याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वीच शहरात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत जड वाहनांना बंदी असली तरी त्याचे पालन होत नाही.नंदुरबारातील जड वाहनांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहर वाहतुक शाळा शिस्त लावण्यासाठी प्रय}शील असली तरी शहरातील अरुंद रस्ते, त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि वाहनचालकांमध्येच स्वयंशिस्तीचा अभाव यामुळे वाहतूक शाखेलाही हात टेकावे लागतात. आता पालिकेने ट्रक टर्मिनस उभारले आहे. ते येत्या काही दिवसात पुर्णपणे कार्यान्वीत झाल्यावर शहरातील वाहतुकीची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नंदुरबारात मोठे व्यापारी, गोडावूनमध्ये माल उतरविणारे हे सर्रास मोठी वाहने, अवजड ट्रका शहरात आणतात. अनेक व्यापा:यांचे गोडावून व होलसेलची दुकाने ही शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे नाईलाजाने अशी वाहने शहरात आणावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या नेहमीच निर्माण होते. याशिवाय लहान, मोठे अपघात देखील होतात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी होत होती.वाहतूक शाखेचेही आदेशवाहतूक शाखेने पाच ते सहा वर्षापूर्वी दिवसा अर्थात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु अधिकारी बदलल्यानंतर आदेशही रद्द होतात किंवा बदलतात. या आदेशाचीही तीच स्थिती झाली. संबधित विभागाचे अधिकारी बदलले आणि लागलीच निर्णयही बदलला गेला. यामुळे जड वाहने सर्रास दिवसभर शहरात येतात. अरुंद रस्त्यांवर ते तासंतास रहदारीची समस्या निर्माण करतात. वाहतूक शाखेत आधीच कर्मचा:यांची संख्या कमी असल्यामुळे सर्वच ठिकाणी वाहतूक पोलीस पोहचू शकत नसल्यामुळे प्रश्न  निर्माण होतात.ट्रक टर्मिनस तयारशहरात पालिकेने तयार केलेले ट्रक टर्मिनस बांधून तयार आहे. त्याचा शुभारंभही करण्यात आला. परंतु काही कामे अपुर्ण असल्यामुळे ते पुर्णपणे कार्यान्वीत करण्यात आले नव्हते. आता कामे पुर्ण झाल्यानंतर येत्या 26 जानेवारीपासून ट्रक टर्मिनस पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. त्यामुळे पालिकेतर्फेच आता शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. समन्वयाने अंमलबजावणी व्हावीशहर वाहतूक शाखा आणि पालिकेने आता या आदेशाची समन्वयाने अंमलबजावणी करावी. पालिकेने सर्व गोडावून मालक, होलसेल विक्रेते आणि इतर व्यापा:यांना यासंदर्भात नोटीसा बजावून त्यांचे माल घेवून येणारे जड वाहने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेर्पयत शहरात येणार नाहीत. आल्यास दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश देणे आवश्यक आहे. वाहतूक शाखा देखील कायदेशीर कारवाई करणारच. दोघांनी समन्वयाने या आदेशाची अंमलजावणी केल्यास वाहतुकीची समस्या सुटणार आहे.