शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी-नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला ३८ कोटी निधी देऊनही खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी शासनाने मंजूर केलेले ३८ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी शासनाने मंजूर केलेले ३८ कोटी खर्च करुनही खड्डे कमी न होता वाढत आहेत़ याबाबत नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणकडे तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्गाने करण चौफुली व पुढे तळोदा रस्त्याला मिळणाºया महामार्गावर करण चौफुली आणि तळोदा रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाने येथे मुरूम टाकला होता़ हा मुरुम वाहून गेला आहे़ यानंतर खड्डे उघडे पडले असून अवजड वाहने याठिकाणी फसत असून दुचाकीस्वार खड्ड्यात पडून अपघात होत आहे़ महाराष्ट्र राज्य सार्वजिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विंगला शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाची जबाबदारी शासनाकडून सोपवण्यात आली आहे़ हा महामार्ग विस्तारीकरणाचे काम अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नसले तरी सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दुरूस्ती व बळकटीकरण यासाठी ३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करुन काम सुरू करण्याचे सूचित केले होते़ यात ७ कोटी ७२ लाख रूपये हे निव्वळ २०२० च्या पावसाळ्यात खड्डे निर्माण होवू नये व झाल्यास ते बुजवता यावे यासाठी दिले आहेत़ यासाठी बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरणने दोन ठेकेदार नियुक्त करुन काम सुरू करण्याची अपेक्षा होती़ परंतु प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजवण्याचा आव आणत काम झाल्याचे निर्दशनास आले आहे़ परिणामी अक्कलकुवा तालुक्यालगत गुजरात हद्द ते शेवाळीपर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम हे नावाला असल्याचे दिसून आले आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळूनही नंदुरबार शहरातील दोन्ही चौफुल्यांवरचे खड्डे न बुजवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ काही ठिकाणी रस्ता काम न्यायालयीन कक्षेत असले तरीही मूळ रस्ता दुरूस्तीत न्यायालयाने कोणताही ‘स्टे’ दिलेला नसतानाही न्यायालयाचे कारण देत काम टाळले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ दरम्यान या महामार्गाचा नवीन डीपीआर शासनाकडे संमतीसाठी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रकल्पाचा खर्च काही हजार कोटीत वाढला असल्याने महामार्गाचे विस्तारीकरण अथवा चौपदरीकरण प्रस्तावित आहे़