शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

महसुली दर्जाअभावी विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ग्रामपंचायतही नसल्याने ग्रामस्थ व गाव विकासापासून वंचित आहे. जिल्हा प्रशासनाने या गावाकडे लक्ष देऊन त्वरित महसुली दर्जा देऊन व ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.जयनगर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उभादगड व धांद्र खुर्द हे दोन गावे आहेत. या गावांची लोकसंख्या अनुक्रमे १५०० व १३०० आहे. नवीन जनगणना केल्यास ही लोकसंख्या वाढणार आहे. हातमजुरीचे काम करून येथील कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या गावांना महसुली दर्जा नसल्याने शासनाच्या वैयक्तिक योजनांपासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत असल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. या गावांचा भूदान चळवळ व चारा सत्याग्रहात सक्रीय सहभाग राहिला असून अनेकांनी बलिदान दिले आहे. असे असताना या गावांना महसुली दर्जा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत निवडणूकमतदानापासून वंचितलोकशाहीत प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे हे जरी सत्य असले तरी उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना ग्रामपंचायत मतदानापासून वंचित राहावे लागते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या निवडणुकीतच मतदान करण्याच्या अधिकार येथील मतदारांना आहे. या गावांसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने मतदार मतदानापासून व गावाच्या विकासापासून आजही कोसो लांब आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न या गावातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या या गावांकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. ६५ वर्षानंतर उभादगड या गावाला प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली आहे. ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर निवडणुकांसाठी मतदान करण्याचा अधिकार येथील मतदारांना आहे मात्र गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतच अस्तित्वात नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणे किंवा सदस्य निवडीचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी दोन्ही गावांसाठी ग्रुपग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची गरज आहे.उभादगड व धांद्रे खुर्द या दोन्ही गावांचा विकास व तेथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोन्ही गावांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणून गावांचा व ग्रामस्थांचा विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना महसुली दर्जा नाही. तसेच ग्रामपंचायत नाही किंवा जवळच्या गावातील ग्रामपंचायतीतही समावेश नाही. परिणामी गावात विकास योजना राबविता येत नाहीत. शासनाची कुठलीही योजना या गावांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. गावासाठी स्वतंत्र शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना जयनगर येथील कर्मचाºयांकडून दाखले उपलब्ध करावे लागतात. १४ वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत येणाºया निधीतून अनेक गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. मात्र या दोन्ही गावातील ग्रामस्थांना निधी तर सोडा पण या योजनांची व निधी कसा येतो याचीही माहिती नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ येथील ग्रामस्थांना घेता येत नाही.