शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महसुली दर्जाअभावी विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ग्रामपंचायतही नसल्याने ग्रामस्थ व गाव विकासापासून वंचित आहे. जिल्हा प्रशासनाने या गावाकडे लक्ष देऊन त्वरित महसुली दर्जा देऊन व ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.जयनगर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उभादगड व धांद्र खुर्द हे दोन गावे आहेत. या गावांची लोकसंख्या अनुक्रमे १५०० व १३०० आहे. नवीन जनगणना केल्यास ही लोकसंख्या वाढणार आहे. हातमजुरीचे काम करून येथील कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या गावांना महसुली दर्जा नसल्याने शासनाच्या वैयक्तिक योजनांपासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत असल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. या गावांचा भूदान चळवळ व चारा सत्याग्रहात सक्रीय सहभाग राहिला असून अनेकांनी बलिदान दिले आहे. असे असताना या गावांना महसुली दर्जा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत निवडणूकमतदानापासून वंचितलोकशाहीत प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे हे जरी सत्य असले तरी उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना ग्रामपंचायत मतदानापासून वंचित राहावे लागते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या निवडणुकीतच मतदान करण्याच्या अधिकार येथील मतदारांना आहे. या गावांसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने मतदार मतदानापासून व गावाच्या विकासापासून आजही कोसो लांब आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न या गावातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या या गावांकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. ६५ वर्षानंतर उभादगड या गावाला प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली आहे. ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर निवडणुकांसाठी मतदान करण्याचा अधिकार येथील मतदारांना आहे मात्र गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतच अस्तित्वात नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणे किंवा सदस्य निवडीचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी दोन्ही गावांसाठी ग्रुपग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची गरज आहे.उभादगड व धांद्रे खुर्द या दोन्ही गावांचा विकास व तेथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोन्ही गावांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणून गावांचा व ग्रामस्थांचा विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना महसुली दर्जा नाही. तसेच ग्रामपंचायत नाही किंवा जवळच्या गावातील ग्रामपंचायतीतही समावेश नाही. परिणामी गावात विकास योजना राबविता येत नाहीत. शासनाची कुठलीही योजना या गावांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. गावासाठी स्वतंत्र शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना जयनगर येथील कर्मचाºयांकडून दाखले उपलब्ध करावे लागतात. १४ वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत येणाºया निधीतून अनेक गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. मात्र या दोन्ही गावातील ग्रामस्थांना निधी तर सोडा पण या योजनांची व निधी कसा येतो याचीही माहिती नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ येथील ग्रामस्थांना घेता येत नाही.