शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:21 IST

परतीच्या पावसाचा फटका : शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देपावसाच्या सरासरीत तीन टक्क्यांनी वाढ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात 89 टक्के पाऊस झाला. परंतु परतीच्या पावसामुळे ही टक्केवारी आता 92 टक्केर्पयत गेली आहे. अर्थात सरासरीचा तीन टक्के पाऊस आठवडाभरात झाला आहे. नवापूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीच

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अनियमित पावसामुळे यंदा उत्पादकता घटलेली असतांना आता हातातोंडाशी आलेला घास देखील लहरी निसर्गाने हिरावल्याने शेतक:यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवार्पयत महसूल कर्मचा:यांचा संप सुरू होता, त्यामुळे पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. यंदा परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. गेल्या आठवडय़ापासून अनेक भागात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक असतांना आठ दिवस होण्यात आले तरी पंचनाम्यांबाबत काहीही हालचाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर अखेर सरासरी 89 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच टक्के पाऊस अधीक आहे. असे असले तरी अनियमितता आणि काही भागातच पावसाचा अधीक जोर यामुळे अनेक भागात खरीपाची स्थिती वाईट होती. त्यामुळे विविध पिकांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेता शेतक:यांनी जेमतेम नियोजन केलेले असतांनाच परतीचा पावसाने ते नियोजन देखील आता कोलमडले आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक अर्थात 80 हजार हेक्टर  र्पयत आहे. त्यामुळे परतीचा  पावसाचा सर्वाधिक फटका हा  कापूस या पिकाला बसला आहे. वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाला. परिणामी त्या कापसाची प्रतवारी देखील कमी झाली. त्याचा फटका भाव कमी होण्यात झाला. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच चार हजारार्पयत भाव खेतिया बाजार समितीत मिळाला होता. स्थानिक ठिकाणी देखील याच भावात कापूस खरेदी केली जात होती. परंतु पावसात भिजल्यामुळे कापूस तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत घसरला आहे. याशिवाय काढणीवर आलेल्या भाताचेही  नवापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे. वादळवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पपई आणि केळीचेही नुकसान शहादा व नंदुरबार तालुक्यात झाले आहे. यामुळे शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते नुकसान भरून काढणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.पंचनामे तातडीने करावेनुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध भागातील शेतक:यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेध शाळेने पावसाचा अंदाज 14 ऑक्टोबर्पयत वर्तविला होता. त्यामुळे पंचनामे लांबल्याचे बोलले जात आहे.याशिवाय महसूल कर्मचा:यांच्या संपामुळे देखील पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. सोमवारपासून पंचनामे सुरू होणार असून तातडीने अहवाल राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.