शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:21 IST

परतीच्या पावसाचा फटका : शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देपावसाच्या सरासरीत तीन टक्क्यांनी वाढ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात 89 टक्के पाऊस झाला. परंतु परतीच्या पावसामुळे ही टक्केवारी आता 92 टक्केर्पयत गेली आहे. अर्थात सरासरीचा तीन टक्के पाऊस आठवडाभरात झाला आहे. नवापूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीच

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अनियमित पावसामुळे यंदा उत्पादकता घटलेली असतांना आता हातातोंडाशी आलेला घास देखील लहरी निसर्गाने हिरावल्याने शेतक:यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवार्पयत महसूल कर्मचा:यांचा संप सुरू होता, त्यामुळे पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. यंदा परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. गेल्या आठवडय़ापासून अनेक भागात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक असतांना आठ दिवस होण्यात आले तरी पंचनाम्यांबाबत काहीही हालचाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर अखेर सरासरी 89 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच टक्के पाऊस अधीक आहे. असे असले तरी अनियमितता आणि काही भागातच पावसाचा अधीक जोर यामुळे अनेक भागात खरीपाची स्थिती वाईट होती. त्यामुळे विविध पिकांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेता शेतक:यांनी जेमतेम नियोजन केलेले असतांनाच परतीचा पावसाने ते नियोजन देखील आता कोलमडले आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक अर्थात 80 हजार हेक्टर  र्पयत आहे. त्यामुळे परतीचा  पावसाचा सर्वाधिक फटका हा  कापूस या पिकाला बसला आहे. वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाला. परिणामी त्या कापसाची प्रतवारी देखील कमी झाली. त्याचा फटका भाव कमी होण्यात झाला. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच चार हजारार्पयत भाव खेतिया बाजार समितीत मिळाला होता. स्थानिक ठिकाणी देखील याच भावात कापूस खरेदी केली जात होती. परंतु पावसात भिजल्यामुळे कापूस तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत घसरला आहे. याशिवाय काढणीवर आलेल्या भाताचेही  नवापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे. वादळवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पपई आणि केळीचेही नुकसान शहादा व नंदुरबार तालुक्यात झाले आहे. यामुळे शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते नुकसान भरून काढणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.पंचनामे तातडीने करावेनुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध भागातील शेतक:यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेध शाळेने पावसाचा अंदाज 14 ऑक्टोबर्पयत वर्तविला होता. त्यामुळे पंचनामे लांबल्याचे बोलले जात आहे.याशिवाय महसूल कर्मचा:यांच्या संपामुळे देखील पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. सोमवारपासून पंचनामे सुरू होणार असून तातडीने अहवाल राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.