शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:21 IST

परतीच्या पावसाचा फटका : शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देपावसाच्या सरासरीत तीन टक्क्यांनी वाढ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात 89 टक्के पाऊस झाला. परंतु परतीच्या पावसामुळे ही टक्केवारी आता 92 टक्केर्पयत गेली आहे. अर्थात सरासरीचा तीन टक्के पाऊस आठवडाभरात झाला आहे. नवापूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीच

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अनियमित पावसामुळे यंदा उत्पादकता घटलेली असतांना आता हातातोंडाशी आलेला घास देखील लहरी निसर्गाने हिरावल्याने शेतक:यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवार्पयत महसूल कर्मचा:यांचा संप सुरू होता, त्यामुळे पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. यंदा परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. गेल्या आठवडय़ापासून अनेक भागात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक असतांना आठ दिवस होण्यात आले तरी पंचनाम्यांबाबत काहीही हालचाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर अखेर सरासरी 89 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच टक्के पाऊस अधीक आहे. असे असले तरी अनियमितता आणि काही भागातच पावसाचा अधीक जोर यामुळे अनेक भागात खरीपाची स्थिती वाईट होती. त्यामुळे विविध पिकांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेता शेतक:यांनी जेमतेम नियोजन केलेले असतांनाच परतीचा पावसाने ते नियोजन देखील आता कोलमडले आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक अर्थात 80 हजार हेक्टर  र्पयत आहे. त्यामुळे परतीचा  पावसाचा सर्वाधिक फटका हा  कापूस या पिकाला बसला आहे. वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाला. परिणामी त्या कापसाची प्रतवारी देखील कमी झाली. त्याचा फटका भाव कमी होण्यात झाला. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच चार हजारार्पयत भाव खेतिया बाजार समितीत मिळाला होता. स्थानिक ठिकाणी देखील याच भावात कापूस खरेदी केली जात होती. परंतु पावसात भिजल्यामुळे कापूस तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत घसरला आहे. याशिवाय काढणीवर आलेल्या भाताचेही  नवापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे. वादळवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पपई आणि केळीचेही नुकसान शहादा व नंदुरबार तालुक्यात झाले आहे. यामुळे शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते नुकसान भरून काढणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.पंचनामे तातडीने करावेनुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध भागातील शेतक:यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेध शाळेने पावसाचा अंदाज 14 ऑक्टोबर्पयत वर्तविला होता. त्यामुळे पंचनामे लांबल्याचे बोलले जात आहे.याशिवाय महसूल कर्मचा:यांच्या संपामुळे देखील पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. सोमवारपासून पंचनामे सुरू होणार असून तातडीने अहवाल राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.