शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बचावची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे करण्यात आली़ सोमवारी नर्मदा बचाव आंदोलनच्या कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केल़े यावेळी नर्मदा बचावतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, नर्मदा खो:यातील 33 गावे व 14 पुनर्वसन वसाहतीत पुनर्वसन पूर्ण झाले नसताना बेकायदेशीरपणे धरणात पाणी साठवले गेल़े जून 2019 पासून राज्यात मुसळधार पाऊस, अतीवृष्टी व निकासाची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील बाधितांची शेतीही बुडाली़ अनेक शेतक:यांची शेती वाहून गेली़ तसेच अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आह़े कालांतराने अवकाळीमुळेही पिकांची हानी झाली आह़े यामुळे जिल्ह्यातील पावसाळ्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे योग्य त्या पद्धतीने करुन योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे नियोजन करावे, आरसीईपी कराराला पुढे जाऊ देऊ नये, देशातील अर्थव्यवस्था शेती व ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होणार आह़े यातून आसीईपी करार त्वरीत रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे हे जलदगतीने करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, सरदार सरोवराची पातळी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 138़68 मीटर पूर्ण भरल्यामुळे शेकडो घरे टापू, बुडीतात आली व शेकडो हेक्टर शेती पाण्यात गेली आह़े त्यापैकी ज्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ त्यांना भरपाई तसेच पंचनामे पूर्ण नसल्यास ते करण्याची आदेश देण्याची मागणी करण्यात आली आह़े यावेळी कांतीलाल पावरा, किरसिंग वसावे, ओरसिंग पटले, चेतन साळवे, लतिका राजपूत, कृष्णा पावरा, सिमजी पावरा, मान्या पावरा, हिरालाल पावरा, लालसिंग वसावे, कालुसिंग पाडवी यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होत़े