शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

तापीचे पाणी दोन नाल्यांसह सुकळ नदीत टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:11 IST

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 ...

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 गावातील सरपंच, उपसरपंचासह शेतक:यांनी धुळे येथे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन देखील दिले.नंदुरबार तालुक्यातील वावद, चौपाळे, उमर्दे, दोन्ही दहिंदुले, धामडोद, कोळदे, कठोरे, पातोंडा, होळ, राकसवाडे, घुली, पळाशी, वरूळ, खोडसगाव, लहान शहादे, शिंदे या परिसरातील सुमारे 18 गावांमधील सरपंच, उपसरपंच व शेतक:यांनी एकत्र येत जलसंपदामंत्री गिरीष महाजन व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, तापी बुराई प्रकल्पाद्वारे पाणी निंभेल, रनाळे, बलदाणे, शनिमांडळ, अमरावती प्रकल्पासह बुराई नीदत टाकले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाची मुख्य जलवाहीनी रनाळे मार्गे शनिमांडळ व बुराई नदीत जाणार आहे. वावद, चौपाळे ते कोळदे परिसरातील वावद येथून बोधीकानाला, घागरी व सुकळ नद्यांवर धरणे बांधली गेल्याने गेल्या 15 वर्षापासून नद्या मृत झाल्या आहेत.तापी बुराई प्रकल्पाच्या मुख्य वाहिनीला रनाळे येथून उपवाहिनी वावदकडे दिल्यास केवळ तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे काठय़ादेव टेकडी र्पयत पाणी टाकता येईल. पुढील नाल्यामधून ग्रॅव्हीटीद्वारे वावदर्पयत पाणी येवून पुढील तीन्ही नद्यांमध्ये जावून चौपाळे धरण भरेल. परिणामी थेट वरील 18 गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार एकर शेती विहिरीद्वारे सिंचन होवून बागायती होवू शकते. जलसंपदामंत्री महाजन यांनी कामाबाबत सव्रेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका:यांना देवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.