शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 कोटी रुपये देण्याची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आह़े सोमवारी या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून पाठवण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा कोसळलेल्या पावसामुळे कोरड, बागायती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आह़े नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी केले होत़े यात कोरड क्षेत्रात 14 हजार 481 शेतक:यांच्या 6 हजार 723 हेक्टर शेतीचे 13 कोटी 71 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होत़े बागायत क्षेत्रात 11 हजार 285 शेतक:यांच्या 7 हजार 85 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून शेतक:यांना 28 कोटी 69 लाख रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले होत़े तर शहादा तालुक्यातील एका फळबागायतदाराच्या 9 हेक्टर क्षेत्रातील 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आह़े या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीबाबत सुरु असलेला गोंधळ पूर्ण झाल्याचे सांगून हा अहवाल विभागीय आयुक्त यांना देत शासनाकडून शेतक:यांना नुकसानभरपाई म्हणून 42 कोटी 45 लाख 53 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आह़े तूर्तास विभागीय स्तरावर असलेल्या या प्रस्तावाला मंजूरी मिळणार असल्याची अपेक्षा महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात येत आह़े प्रस्तावानुसार भरपाईची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांच्या खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े यासाठी पंचनामे सुरु असतानाच तलाठींकडून नुकसानग्रस्त शेतक:यांकडून बँक खाते माहिती भरुन घेत इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े मागणीचा प्रस्ताव सादर झाल्याने येत्या काळात होणा:या पुढील कारवाईकडे शेतक:यांचे लक्ष लागले आह़े