शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

असलोद परिसरात पाणीटंचाई, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके जेमतेम तग धरून असल्याने उत्पन्नात कमालीची घट येणार     आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.तालुक्यातील पूर्व भागात कापूससह मूग, मका, बाजरी, सोयाबीन व पपईची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने पिकांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने हंगाम हातातून गेल्यातच जमा आहे. दिवाळीनंतर शेतशिवार रिकामे दिसून येणार असून, विहिरी, नदी-नाल्यांसह धरणांमध्ये पूर्ण क्षमतेचा जलसाठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाने आतापासूनच आपले रौद्ररुप दाखवण्यास सुरूवात केली असून, येणा:या काळात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरवर्षी या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदा  तर पुरेशा प्रमाणात पजर्न्यमान न          झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने येणा:या उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने आत्तापासूनच ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मजुरांचे स्थलांतररोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात मजूरवर्ग गुजरात, मध्य प्रदेश व सौराष्ट्रात जात आहेत. परिसरातील दुधखेडा, लोंढरे या धरणात जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारही कमी होणार असल्याने मजुरांनी आतापासून स्थलांतर सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात भारनियमनाचाही फटका शेतक:यांना सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांवर झालेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनातर्फे दुष्काळ सदृष्य तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाकडून शेतशिवारात जावून अधिकारी व कर्मचारी माहिती जाणून घेत आहेत. असलोद येथे तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.आर. लहाने, तलाठी सुरेखा राठोड, कृषी पर्यवेक्षक कोळी यांनी शेतात जावून पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते. शासनानेदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.