शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

असलोद परिसरात पाणीटंचाई, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके जेमतेम तग धरून असल्याने उत्पन्नात कमालीची घट येणार     आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.तालुक्यातील पूर्व भागात कापूससह मूग, मका, बाजरी, सोयाबीन व पपईची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने पिकांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने हंगाम हातातून गेल्यातच जमा आहे. दिवाळीनंतर शेतशिवार रिकामे दिसून येणार असून, विहिरी, नदी-नाल्यांसह धरणांमध्ये पूर्ण क्षमतेचा जलसाठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाने आतापासूनच आपले रौद्ररुप दाखवण्यास सुरूवात केली असून, येणा:या काळात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरवर्षी या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदा  तर पुरेशा प्रमाणात पजर्न्यमान न          झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने येणा:या उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने आत्तापासूनच ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मजुरांचे स्थलांतररोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात मजूरवर्ग गुजरात, मध्य प्रदेश व सौराष्ट्रात जात आहेत. परिसरातील दुधखेडा, लोंढरे या धरणात जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारही कमी होणार असल्याने मजुरांनी आतापासून स्थलांतर सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात भारनियमनाचाही फटका शेतक:यांना सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांवर झालेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनातर्फे दुष्काळ सदृष्य तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाकडून शेतशिवारात जावून अधिकारी व कर्मचारी माहिती जाणून घेत आहेत. असलोद येथे तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.आर. लहाने, तलाठी सुरेखा राठोड, कृषी पर्यवेक्षक कोळी यांनी शेतात जावून पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते. शासनानेदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.