शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

असलोद परिसरात पाणीटंचाई, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके जेमतेम तग धरून असल्याने उत्पन्नात कमालीची घट येणार     आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.तालुक्यातील पूर्व भागात कापूससह मूग, मका, बाजरी, सोयाबीन व पपईची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने पिकांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने हंगाम हातातून गेल्यातच जमा आहे. दिवाळीनंतर शेतशिवार रिकामे दिसून येणार असून, विहिरी, नदी-नाल्यांसह धरणांमध्ये पूर्ण क्षमतेचा जलसाठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाने आतापासूनच आपले रौद्ररुप दाखवण्यास सुरूवात केली असून, येणा:या काळात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरवर्षी या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदा  तर पुरेशा प्रमाणात पजर्न्यमान न          झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने येणा:या उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने आत्तापासूनच ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मजुरांचे स्थलांतररोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात मजूरवर्ग गुजरात, मध्य प्रदेश व सौराष्ट्रात जात आहेत. परिसरातील दुधखेडा, लोंढरे या धरणात जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारही कमी होणार असल्याने मजुरांनी आतापासून स्थलांतर सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात भारनियमनाचाही फटका शेतक:यांना सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांवर झालेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनातर्फे दुष्काळ सदृष्य तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाकडून शेतशिवारात जावून अधिकारी व कर्मचारी माहिती जाणून घेत आहेत. असलोद येथे तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.आर. लहाने, तलाठी सुरेखा राठोड, कृषी पर्यवेक्षक कोळी यांनी शेतात जावून पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते. शासनानेदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.