शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता जलदिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाकरीत ग्रामस्थांनी 50 हजार वृक्ष लावण्याच्या संकल्प केला.                              शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण व तलावासह बंधारे डिसेंबर महिन्यातच कोरडे होऊ लागलेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बागायत शेतीच्या प्रमाणातही घटत होत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणा:या पाण्याचे हे दुर्भिक्ष जाणवत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. उन्हाळ्यात येथील तापमान उच्चांक गाठणारा असून, 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान मे महिन्यार्पयत राहणार असल्याने त्याची झळ नागरिकांना पोहोचणार आहे. दामळदा येथ ‘चला कामाला लागुया’ पान लोटचे काम करूया, माती आडवा पाणी जिरवा याप्रमाणे ग्रामपंचायत व पाणी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहण्याकरिता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.ग्रामपंचायत सरपंच हरेरामाकृष्ण मालचे, उपसरपंच डॉ.विजय नामदेव चौधरी, माजी पोलीस पाटील प्रवीण मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत सजन पाटील, तुंबा मकरंद पाटील, शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे भरत महाजन, रंजना  पाटील, द्वारकाबाई माळी, मुख्याध्यापिका मनीषा पाटील,  करुणा पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक आर.एस.रांगणगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद गावातील लहान मुलांपासून वृद्ध माणसांर्पयत सर्वानी पर्यावरण रॅलीत सहभाग नोंदवला आहे. गावातील महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जल दिवसाचे अवचित्त साधून पर्यावरण बचाव रॅलीमध्ये ेग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाणी आडवा, पाणी जिरवा बाबत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावावीत असा निर्धार करण्यात आला आहे. पर्यावरण टिकले तरच पाण्याची बचत होईल. येणा:या पावसाळ्यार्पयत  50 हजार झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पाणी अडवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात  आले आहे. कच्चा बंधारा, पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. शेतात असलेल्या पालापाचोळ्याच्या खतासाठी उपयोग करण्यात यावा तसेच गुराढोरांच्या चा:यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे या वेळी ठरविले.