शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता जलदिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाकरीत ग्रामस्थांनी 50 हजार वृक्ष लावण्याच्या संकल्प केला.                              शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण व तलावासह बंधारे डिसेंबर महिन्यातच कोरडे होऊ लागलेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बागायत शेतीच्या प्रमाणातही घटत होत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणा:या पाण्याचे हे दुर्भिक्ष जाणवत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. उन्हाळ्यात येथील तापमान उच्चांक गाठणारा असून, 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान मे महिन्यार्पयत राहणार असल्याने त्याची झळ नागरिकांना पोहोचणार आहे. दामळदा येथ ‘चला कामाला लागुया’ पान लोटचे काम करूया, माती आडवा पाणी जिरवा याप्रमाणे ग्रामपंचायत व पाणी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहण्याकरिता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.ग्रामपंचायत सरपंच हरेरामाकृष्ण मालचे, उपसरपंच डॉ.विजय नामदेव चौधरी, माजी पोलीस पाटील प्रवीण मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत सजन पाटील, तुंबा मकरंद पाटील, शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे भरत महाजन, रंजना  पाटील, द्वारकाबाई माळी, मुख्याध्यापिका मनीषा पाटील,  करुणा पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक आर.एस.रांगणगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद गावातील लहान मुलांपासून वृद्ध माणसांर्पयत सर्वानी पर्यावरण रॅलीत सहभाग नोंदवला आहे. गावातील महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जल दिवसाचे अवचित्त साधून पर्यावरण बचाव रॅलीमध्ये ेग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाणी आडवा, पाणी जिरवा बाबत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावावीत असा निर्धार करण्यात आला आहे. पर्यावरण टिकले तरच पाण्याची बचत होईल. येणा:या पावसाळ्यार्पयत  50 हजार झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पाणी अडवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात  आले आहे. कच्चा बंधारा, पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. शेतात असलेल्या पालापाचोळ्याच्या खतासाठी उपयोग करण्यात यावा तसेच गुराढोरांच्या चा:यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे या वेळी ठरविले.