शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता जलदिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाकरीत ग्रामस्थांनी 50 हजार वृक्ष लावण्याच्या संकल्प केला.                              शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण व तलावासह बंधारे डिसेंबर महिन्यातच कोरडे होऊ लागलेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बागायत शेतीच्या प्रमाणातही घटत होत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणा:या पाण्याचे हे दुर्भिक्ष जाणवत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. उन्हाळ्यात येथील तापमान उच्चांक गाठणारा असून, 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान मे महिन्यार्पयत राहणार असल्याने त्याची झळ नागरिकांना पोहोचणार आहे. दामळदा येथ ‘चला कामाला लागुया’ पान लोटचे काम करूया, माती आडवा पाणी जिरवा याप्रमाणे ग्रामपंचायत व पाणी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहण्याकरिता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.ग्रामपंचायत सरपंच हरेरामाकृष्ण मालचे, उपसरपंच डॉ.विजय नामदेव चौधरी, माजी पोलीस पाटील प्रवीण मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत सजन पाटील, तुंबा मकरंद पाटील, शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे भरत महाजन, रंजना  पाटील, द्वारकाबाई माळी, मुख्याध्यापिका मनीषा पाटील,  करुणा पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक आर.एस.रांगणगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद गावातील लहान मुलांपासून वृद्ध माणसांर्पयत सर्वानी पर्यावरण रॅलीत सहभाग नोंदवला आहे. गावातील महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जल दिवसाचे अवचित्त साधून पर्यावरण बचाव रॅलीमध्ये ेग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाणी आडवा, पाणी जिरवा बाबत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावावीत असा निर्धार करण्यात आला आहे. पर्यावरण टिकले तरच पाण्याची बचत होईल. येणा:या पावसाळ्यार्पयत  50 हजार झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पाणी अडवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात  आले आहे. कच्चा बंधारा, पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. शेतात असलेल्या पालापाचोळ्याच्या खतासाठी उपयोग करण्यात यावा तसेच गुराढोरांच्या चा:यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे या वेळी ठरविले.