शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

आदिवासींना खावटी अनुदान तातडीने वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोना लसीकरण आढवा घेण्यासाठी आले असता, त्यांची लोकसंघर्षच्या प्रतिभाताई शिंदे यांनी ...

नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोना लसीकरण आढवा घेण्यासाठी आले असता, त्यांची लोकसंघर्षच्या प्रतिभाताई शिंदे यांनी भेट घेऊन त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील मुख्य प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तसा कमी आहे व विशेषतः धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात तर तो अधिक कमी आहे. मात्र या जिल्ह्यातील स्थानिक हजारो लोकांना रोजगाराअभावी उपजीविकेसाठी जे स्थलांतर करावे लागते त्यामुळे त्यांना कोरोनाची बाहेर लागण होण्याची शक्यता आहे. तसेच अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात जे शासकीय कर्मचारी वर्ग आहे. तो स्थानिक ठिकाणी न राहता नंदुरबार सारख्या शहरी वस्तीतून अपडाऊन करतो. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव ह्या भागात मोठ्या प्रमाणत वाढण्याची शक्यता प्रतिभा शिंदे यांनी त्यांचा लक्षात आणून दिली.

जिल्ह्यात मागील काळात कोरोनामुळे रोजगार व उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने खावटी अनुदान जाहीर केले असले तरी अजूनही ते मिळालेले नाही. त्यामुळे लोकांमधे प्रचंड रोष असून, आमच्या हक्काचे खावटी अनुदान तात्काळ मंजूर करावे. शिवाय

जिल्ह्यात लसीकरणासोबतच रोजगार उपलब्ध करून देणे हा तितकाच गंभीर मुद्दा आहे. त्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यांचा रोजगार व नैसर्गिक संपदानिर्मिती, संपूर्ण पाणलोट आधारित रोजगार निर्मितीचा प्लॅन बनवला जावून त्याची तात्काळ अमलबजावणी केली जावी.

नंदुरबार जिल्ह्यातील विकासात सर्वात मोठी बाधा म्हणजे प्रलबित असलेले वन जमिनीचे प्रकरणे. वनजमीनधारकांच्या प्रलंबित दाव्यांबाबत उपविभागीय जिल्हास्तरीय समिती हे परिस्थितीजन्य पुरावे लक्षात न घेता मोठ्या प्रमाणात दावे अपात्र करीत आहेत. त्याबाबत कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी होण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत. तसेच मंजूर दावेधारकांना सातबारा देत त्यांना सर्वांना बिरसा मुंडा योजनेचा लाभ द्यावा. महसूल प्रशासनाने तळोदा तालुक्यातील जीवन जमीन महसुली केली तिचा प्रश्न वर्षांनू वर्ष प्रलंबित असून, त्यांनी सादर केलेले दावे हे वन कायद्याच्या चौकटीतच सोडवणे गरजेचे आहे. याबाबतीत कॅबिनेटमध्ये धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील आम्हाला केवळ आश्वासन दिले जाते. मात्र हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. तरी कॅबिनेटमध्ये स्पेशल विषय घेवून हा प्रश्न मार्गी लावावा.

तापी नर्मदेतील १०.८९ टीएमसी पाणी महाराष्ट्राला वापरायला मिळालेले आहे. त्याचे ही अद्याप नियोजन झालेले नाही. नर्मदेतील हे पाणी कुठलेही विस्थापन न होऊ देता धडगांव, अक्कलकुवा या आदिवासी तालुक्यांना प्राधान्य देत ते उचलले पाहिजे. जेणे करून धडगाव व अक्कलकुवा तालुका सुजलाम सुफलाम होतील.

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी व परिसरातील गावांना मिळालेल्या सामूहिक वन हक्कांच्या अधिकारांतर्गत या ग्रासमसभांच्या मदतीने पर्यटन विकास केला जावा, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

या वेळी प्रतिभा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याने या मुद्यांवर त्वरित मार्ग काढण्याची मागणी केली.

निवेदन देताना संजय महाजन, बाबूसिंग नाईक, निशांत मगरे, काथा वसावे, जिलाबाई वसावे आदी सोबत होते.