लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मजुर, शेतकरी व शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यामंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले.नंदुरबार जिल्ह्यांतर्गत मजूर, शेतमजूर व शेतकरी रोजगारासाठी प्रवास करीत असतात शिवाय अनेक शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत नेत असतो. अशा वाहनांवर पोलीस प्रशासन परिवहन विभागामार्फत कारवाही करण्यात येते. या कारवाईमुळे मजूर कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. शेतमाल देखील वेळेवर नेता येत नाही. परिणामी त्या-त्या घटकातील बांधवांच्या समस्यांमध्ये भर पडत असते. या समस्यांवर मात करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अशा वाहनांवर कारवाई न करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मजूरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
मजूरांच्या वाहनांवर कारवाई टाळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:33 IST