शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

ग्राम सुरक्षा दलाच्या हाती गावांची रक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या सिमा सील करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून बाहेरील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. तीन शिप्टमध्ये नेमून दिलेले रक्षक हे गावाच्या सिमेचे रक्षण करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या मध्य प्रदेशातील सेंधवा येथे तसेच मालेगाव आणि नाशिक येथे कोरोना संसर्गीत रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील सिमावर्ती गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  तसेच त्या त्या भागातील प्रांताधिकारी हे ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. दोन दिवसात 100 गावांमध्ये अशी दले स्थापन करून त्यांना कार्यान्वीत देखील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल विविध पातळीवर सक्रीय आहे. सर्वच भागात पोहचण्यात प्रशासनाला मर्यादा असल्यामुळे आता गावातील युवकांची मदत घेवून त्यांना प्रशासनास सहकार्य करण्यासाठी पुढे आणले आहे. या करीता सरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून युवकांची निवड करून त्यांना ग्राम सुरक्षा दलात निवड करण्यात आली आहे. प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दले स्थापन करण्यात येवून त्यांना स्थानिक पोलीस अधिका:यांकडून प्राथमिक स्तरावर प्रशिक्षीत करण्यात आले आहे. निवड केलेल्या युवकांवर  यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल नसावे ही प्रमुख अट आहे. त्यानुसार या युवकांची निवड करण्यात आली  आहे. 100 पेक्षा अधीक गावेनंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर हे तालुके मध्यप्रदेश व   गुजरात राज्याच्या सिमेवर आहेत. त्यामुळे आधी तालुक्यांच्या    सिमावर्ती भागातील गावांमध्ये ही दले स्थापन करण्यात आली आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील 19, अक्कलकुवा तालुक्यातील 17 तर नवापूर तालुक्यात 40 गावांसह इतर तालुक्यात देखील दलांची स्थापना करून गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील ग्राम सुरक्षा दले कार्यान्वीत देखील झाली आहेत. तीन शिफ्टमध्ये ते तैणात करण्यात आली आहेत. बॅरीकेडींग लावून सीलगावात येणा:या मुख्य रस्त्यांवर गावाच्या सिमेलगत बॅरीकेडींग लावण्यात आले आहे. या ठिकाणी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना बसण्यासाठी सावलीची, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था   राहावी यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. काही गावात मोठे लाकडाची ओंडके किंवा काटेरी झाडांच्या फांद्या लावण्यात आल्या आहेत. गावात येणा:यांना अडविले जावून काही निरोप असल्यास दलातील सदस्यांमार्फत संबधितांर्पयत पोहचविला जात   आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तीला    गावात प्रवेश दिला जात नसल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांना देखील सर्व चौकशी करूनच आत सोडण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी विविध वस्तू विक्रेत्यांना गावाच्या बाहेरच थांबवून तेथेच खरेदीसाठी ग्रामस्थांना बोलविले जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 9, शहादा तालुक्यात सहा, अक्कलकुवा तालुक्यातील पाच तर नवापूर तालुक्यातील चार रस्ते हे गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून येतात. यापैकी चार रस्ते हे राज्यमार्ग, दोन रस्ते हे महामार्ग स्वरूपाचे तर इतर रस्ते हे जिल्हा मार्ग म्हणून आहेत. याशिवाय इतरही रस्ते हे कच्चे स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या सर्व रस्त्यांवर नजर ठेवण्यासाठीची कसरत प्रशासनाची होत आहे. यापैकी मोजक्याच रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तर इतर रस्ते हे ग्राम सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले आहेत. आता या दलावरच सर्व सुरक्षा राहणार आहे.