शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ग्राम सुरक्षा दलाच्या हाती गावांची रक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या सिमा सील करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून बाहेरील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. तीन शिप्टमध्ये नेमून दिलेले रक्षक हे गावाच्या सिमेचे रक्षण करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या मध्य प्रदेशातील सेंधवा येथे तसेच मालेगाव आणि नाशिक येथे कोरोना संसर्गीत रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील सिमावर्ती गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  तसेच त्या त्या भागातील प्रांताधिकारी हे ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. दोन दिवसात 100 गावांमध्ये अशी दले स्थापन करून त्यांना कार्यान्वीत देखील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल विविध पातळीवर सक्रीय आहे. सर्वच भागात पोहचण्यात प्रशासनाला मर्यादा असल्यामुळे आता गावातील युवकांची मदत घेवून त्यांना प्रशासनास सहकार्य करण्यासाठी पुढे आणले आहे. या करीता सरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून युवकांची निवड करून त्यांना ग्राम सुरक्षा दलात निवड करण्यात आली आहे. प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दले स्थापन करण्यात येवून त्यांना स्थानिक पोलीस अधिका:यांकडून प्राथमिक स्तरावर प्रशिक्षीत करण्यात आले आहे. निवड केलेल्या युवकांवर  यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल नसावे ही प्रमुख अट आहे. त्यानुसार या युवकांची निवड करण्यात आली  आहे. 100 पेक्षा अधीक गावेनंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर हे तालुके मध्यप्रदेश व   गुजरात राज्याच्या सिमेवर आहेत. त्यामुळे आधी तालुक्यांच्या    सिमावर्ती भागातील गावांमध्ये ही दले स्थापन करण्यात आली आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील 19, अक्कलकुवा तालुक्यातील 17 तर नवापूर तालुक्यात 40 गावांसह इतर तालुक्यात देखील दलांची स्थापना करून गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील ग्राम सुरक्षा दले कार्यान्वीत देखील झाली आहेत. तीन शिफ्टमध्ये ते तैणात करण्यात आली आहेत. बॅरीकेडींग लावून सीलगावात येणा:या मुख्य रस्त्यांवर गावाच्या सिमेलगत बॅरीकेडींग लावण्यात आले आहे. या ठिकाणी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना बसण्यासाठी सावलीची, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था   राहावी यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. काही गावात मोठे लाकडाची ओंडके किंवा काटेरी झाडांच्या फांद्या लावण्यात आल्या आहेत. गावात येणा:यांना अडविले जावून काही निरोप असल्यास दलातील सदस्यांमार्फत संबधितांर्पयत पोहचविला जात   आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तीला    गावात प्रवेश दिला जात नसल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांना देखील सर्व चौकशी करूनच आत सोडण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी विविध वस्तू विक्रेत्यांना गावाच्या बाहेरच थांबवून तेथेच खरेदीसाठी ग्रामस्थांना बोलविले जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 9, शहादा तालुक्यात सहा, अक्कलकुवा तालुक्यातील पाच तर नवापूर तालुक्यातील चार रस्ते हे गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून येतात. यापैकी चार रस्ते हे राज्यमार्ग, दोन रस्ते हे महामार्ग स्वरूपाचे तर इतर रस्ते हे जिल्हा मार्ग म्हणून आहेत. याशिवाय इतरही रस्ते हे कच्चे स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या सर्व रस्त्यांवर नजर ठेवण्यासाठीची कसरत प्रशासनाची होत आहे. यापैकी मोजक्याच रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तर इतर रस्ते हे ग्राम सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले आहेत. आता या दलावरच सर्व सुरक्षा राहणार आहे.