शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे तापमानात घट : वेस्टर्न डिस्टर्बन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:39 IST

ताशी १५ किमी वेगाने वाहताय वारे, बाष्पीभवनाची गती वाढली

नंदुरबार : भारताच्या उत्तर-पश्चिम दिशेला वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाला असल्याने जिल्ह्यासह राज्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झालेली दिसून येत आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ताशी १५ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ ढगाळ हवामान असल्याने जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशाने घट बघायला मिळाली़नंदुरबारात बुधवारी कमाल ३३ तर किमान १७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली़ बुधवारी जिल्ह्यात संपूर्ण दिवस ढगाळ हवामान होते़ त्यासोबतच वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवत असल्याने अनेक ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झाली होती़साधारणत: पुढील तिन दिवस ढगाळ हवामान राहून २ ते ४ मार्च दरम्यान किमान तापमानात पुन्हा काहीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़ दरम्यान, हिमालयाच्या उत्तर-पश्चिम दिशेला चक्रिवादळापूर्वीची स्थिती निर्माण झाली आहे़ या परिसरात हवेचा द्रोणीय वर्तुळ निर्माण झाला असल्याने दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून येत आहे़ साधारणत: २७ फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता़ परंतु अजून पुढील दोन दिवस तरी हीच स्थिती कायम राहणार असल्याचे ‘आयएमडी’च्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीवरुन कळते़या परिस्थितीमुळे उत्तरेकडील प्रदेशात जोरदार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे़ त्यामुळे परिणामी पाऊस झाल्यास राज्यात मुख्यत्वे विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धोका नसला तरीदेखील काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे़ गेल्या आठवड्यापासून उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव कमी झालेला होता़ तसेच बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारेदेखील मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झालेली होती़ त्यामुळे मध्यंतरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात किमान व कमाल तापमान वाढ झालेली दिसून आली़ परंतु हिमालयाजवळ दोन ठिकाणी पुन्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून आल्याने हवामानात वेगाने बदल होताना दिसून येत आहे़ येत्या काही दिवसात तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे़पश्चिमेकडून वाहताय वारेगुजरात राज्याला लागून असलेल्या अरबी समुद्राकडून ताशी ५० ते ६० किमी प्रतिवेगाने वारे वाहत आहेत़ पश्चिम राजस्थानातूनही वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने परिणामी राज्यात हवेच्या वेगात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची स्थिती आहे़ अफगाणिस्तान तसेच मध्ये पाकिस्तानाच्या वर्तुळात चक्रीवादळाला पोषक अशी वातावरणाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहिल्यास भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्येही गारपीठ किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ तसेच आकाशदेखील निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे़