शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

ढगाळ हवामानामुळे तापमानात घट : वेस्टर्न डिस्टर्बन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:39 IST

ताशी १५ किमी वेगाने वाहताय वारे, बाष्पीभवनाची गती वाढली

नंदुरबार : भारताच्या उत्तर-पश्चिम दिशेला वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाला असल्याने जिल्ह्यासह राज्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झालेली दिसून येत आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ताशी १५ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ ढगाळ हवामान असल्याने जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशाने घट बघायला मिळाली़नंदुरबारात बुधवारी कमाल ३३ तर किमान १७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली़ बुधवारी जिल्ह्यात संपूर्ण दिवस ढगाळ हवामान होते़ त्यासोबतच वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवत असल्याने अनेक ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झाली होती़साधारणत: पुढील तिन दिवस ढगाळ हवामान राहून २ ते ४ मार्च दरम्यान किमान तापमानात पुन्हा काहीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़ दरम्यान, हिमालयाच्या उत्तर-पश्चिम दिशेला चक्रिवादळापूर्वीची स्थिती निर्माण झाली आहे़ या परिसरात हवेचा द्रोणीय वर्तुळ निर्माण झाला असल्याने दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून येत आहे़ साधारणत: २७ फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता़ परंतु अजून पुढील दोन दिवस तरी हीच स्थिती कायम राहणार असल्याचे ‘आयएमडी’च्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीवरुन कळते़या परिस्थितीमुळे उत्तरेकडील प्रदेशात जोरदार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे़ त्यामुळे परिणामी पाऊस झाल्यास राज्यात मुख्यत्वे विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धोका नसला तरीदेखील काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे़ गेल्या आठवड्यापासून उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव कमी झालेला होता़ तसेच बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारेदेखील मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झालेली होती़ त्यामुळे मध्यंतरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात किमान व कमाल तापमान वाढ झालेली दिसून आली़ परंतु हिमालयाजवळ दोन ठिकाणी पुन्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून आल्याने हवामानात वेगाने बदल होताना दिसून येत आहे़ येत्या काही दिवसात तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे़पश्चिमेकडून वाहताय वारेगुजरात राज्याला लागून असलेल्या अरबी समुद्राकडून ताशी ५० ते ६० किमी प्रतिवेगाने वारे वाहत आहेत़ पश्चिम राजस्थानातूनही वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने परिणामी राज्यात हवेच्या वेगात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची स्थिती आहे़ अफगाणिस्तान तसेच मध्ये पाकिस्तानाच्या वर्तुळात चक्रीवादळाला पोषक अशी वातावरणाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहिल्यास भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्येही गारपीठ किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ तसेच आकाशदेखील निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे़