दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून या आजाराबाबत सांगितले जाते की, पूर्वी हा आजार ओळखणे अवघड होते. एखाद्या झाडाला कीड लागते तशा प्रकारे रुग्ण खंगून मृत्यूमुखी पडत होता. परंतु नंतर शासनाकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच औषधोपचार वेळेवर होऊ लागल्याने क्षयरोगाचे प्रमाण कमी हाेण्यास मदत होऊ लागली.
आशा स्वयंसेविकांच्या मदतीने रुग्ण बरे
दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा खोकला, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, रात्री खूप घाम येणे, छातीत दुखणे, बेडक्यातून रक्त येणे यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना आशा स्वयंसेविकांकडून तपासणी करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याने त्यांना वेळीच औषधोपचार मिळून क्षयरोग बरा होण्यास मदत होऊ लागली आहे. त्याबरोबरच आरोग्य विभागाकडून क्षयरोगाविषयी मुबलक प्रमाणात जनजागृतीही करण्यात आल्याने तसेच नागरिकांमध्ये क्षयरोग झाला तरी पूर्णपणे औषधोपचार घेतल्याने बरा होतो, याबाबत जनजागृती झाल्यास क्षयरोगाला रोखता येऊ शकते, असा ठाम विश्वास निर्माण झाल्यास क्षयराेग निर्मूलनास मदत होत आहे.
क्षयरोग हा प्रामुख्याने फुफ्फुसाच्या ८० टक्के व इतर अवयवांचा २० टक्के म्हणजे आतडे, हाडे, मणके, गर्भाशय, मूत्रपिंड आदी अवयवांना होऊ शकतो. फक्त आपली नखे व केस यांना क्षयरोग होत नाही.