शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

प्रकाशा येथे १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : येथे इयत्ता आठवी ते १२ वी चे वर्ग शासनाने व शिक्षण विभागाने जारी केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रकाशा : येथे इयत्ता आठवी ते १२ वी चे वर्ग शासनाने व शिक्षण विभागाने जारी केलेल्या नियमानुसार सुरू करावेत, असा निर्णय प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शिक्षण, आरोग्य, महसूल व ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.

याबाबत असे की, प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये शाळा सुरू करावी की नाही यासाठी संबंधित विभागाचा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात चर्चा होऊन ठराव करण्यात आला. या वेळी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आहेत ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी होती. त्यानुसार बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, शिक्षण समितीचे सदस्य हरी पाटील, डॉ.सखाराम चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक बावस्कर, महसूल विभागाचे धर्मराज चौधरी, प्राचार्य ए.के. पटेल, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल, शिक्षक सुरेश जाधव, नरेंद्र गुरव आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामसेवकांनी सांगितले की, गावात १४ जूनपासून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तेव्हा शाळा सुरू करण्यास हरकत नाही. तसेच आरोग्य विभागाचे डॉ.बावस्कर यांनी सांगितले की, शासनाने जारी केलेल्या नियमानुसार आपल्याला शाळा सुरू करता येईल. त्यात अगोदर शाळा निर्जंतुकीकरण करणे, आलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करणे, सेल्फ डिस्टन्सिंगमध्ये बसवणे, घरूनच पाण्याची बॉटल आणणे, असे त्यांनी सांगितले. तसेच सरपंच यांनी गावात रुग्ण नसले तरी प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क घालूनच शाळेत प्रवेश द्यावा, असे सांगितले.

तसेच उपसरपंच भरत पाटील, हरी पाटील यांनी सांगितले की, सर्व शिक्षकांची शाळा सुरू होण्याआधी कोरोना टेस्ट करून घ्यावी.

दरम्यान, शाळेचे प्राचार्य ए.के. पटेल यांनी शासनाने सांगितलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

एकंदरीत या बैठकीत पॉझिटिव्ह विचार ठेवून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत. पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना योग्य त्या सूचना देत काळजी घेण्यास सांगणे.

१५ जुलैपासून आठवी ते १२ वी चे वर्ग प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात सुरू होत असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.