शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

१० लाखांच्या आतील कामे ई-टेंडरिंगतून वगळण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

निदान १० लाखांच्या आतील कामे तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर करू देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या संबंधित विभागाकडे ...

निदान १० लाखांच्या आतील कामे तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर करू देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या २७ मे रोजी ग्रामविकास विभागाने १० लाखांच्या आतील कामांची ऑनलाईन निविदा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निधीच्या आतील विकासकामे स्वतः ग्रामपंचायत करेल. साहजिकच ग्रामविकासाच्या कामांनादेखील ब्रेक बसणार नाही. शिवाय ग्रामपंचायतीची अधिकारी, ठेकेदार यांचा मागे फिरण्याची कटकटही थांबणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे; परंतु पदाधिकारी आणि प्रशासनाने कामांचा दर्जा चांगला राखण्याची अपेक्षा ग्रामीण जनतेने व्यक्त केली आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मनमानीस बसणार चाप

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य अथवा वरिष्ठ अधिकारी यांच्या मनमानीसदेखील शासनाच्या या निर्णयामुळे चाप लागणार आहे. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी प्रमुख अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीचे रस्ते असो किंवा अंगणवाड्यांचे बांधकाम असो पंचायतींना विश्वासात न घेता परस्पर टेंडरिंग करून आपल्या मनमानी पद्धतीने कामे करीत असत. साहजिकच यामुळे कामेही थातुरमातुर केली जात होती. तळोदा तालुक्यात गेल्यावर्षी काही अंगणवाड्यांची नवीन दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टेडरिंग प्रक्रियेचा वेळ वाचला

विकासकामांचा निधी शासनकडून उपलब्ध झाल्याबरोबर संबंधित यंत्रणेकडून कामाच्या निविदेची प्रक्रिया राबवली जाते. यात ठेकेदारांकडून टेंडर भरण्याची वाट पहिली जात असते. त्यामुळे प्रक्रियेला तब्बल १० ते १२ दिवस लागतात. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याची वर्क आऊट दिली जाते. परिणामी, काम सुरू करण्यासाठी मोठा अवधी जात असतो. एकप्रकारे यातून पंचायतींचा वेळ वाचला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाचा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना फटका बसणार आहे. कारण ग्रामीण पातळीवरील अनेक अभियंत्यांना याचा लाभ होत असे.

१० लाखांच्या आतील कामांचे ऑनलाईन टेंडर शासनाने आता रद्द केल्यामुळे पंचायतींच्या विकासकामांना गती मिळून कामे लवकर मार्गी लागतील. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.

- जंगलसिंग ठाकरे, सरपंच, धानोरा, ता. तळोदा.

टेंडरच्या प्रक्रियेमुळे खूप वेळ जातो. त्यामुळे विकासकामेसुद्धा वेळेवर सुरू होत नाहीत. आता शासनाने १० लाखांची कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्याचा अधिकार दिल्याने कामांचा दर्जा सुधारेल व कामे लवकर मार्गी लागतील.

- यमुना पावरा, सरपंच, गोपाळपूर पुनर्वसन, ता. तळोदा.