शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

योग्य भाव न मिळाल्यास पपई तोड बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पपईच्या दराबाबत योग्य तोडगा न निघाल्याने २६ जानेवारीपासून पपई तोड थांबविण्याचा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. पपईला योग्य भाव न मिळाल्यास पपई रस्त्यावर फेकू, असा निर्णयही शेतकऱ्यांनी घेतला आहे.उत्तर भारतात व्यापारी पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये दराने विक्री करीत आहेत. त्यामानाने शहादा तालुक्यातील पपई व्यापारी हे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीत. गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खालावल्याने बागायत शेती करणे शेतकºयांना अवघड झाले आहे. परिणामी मोजकेच शेतकरी पपईची लागवड करीत होते. उत्पन्न कमी निघत असल्याने पपईला व्यापारी योग्य भाव देत होते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते म्हणून पपईचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढले आहे. सद्यस्थितीत दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी थंडीने कहर केला आहे. त्यामुळे या भागात पपईला मागणी वाढली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत पपईला प्रती किलो सध्या ५० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. शहादा तालुक्यात दोन महिन्यापासून व्यापाºयांनी पपईची तोड सुरू केली आहे. सुरुवातीला २२ रुपये प्रती किलो दराप्रमाणे तोड सुरू केली. मात्र नंतर दर कमी करत करत साडेसात रुपयांपर्यंत आणून ठेवल्याने होणारा विरोध पाहता पुन्हा साडेदहा रुपये किलो दराने तोड सुरू केली. परंतु पपईला किमान १४ रुपये प्रती किलो दर मिळावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.गेल्या काही दिवसापासून पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात दराबाबत रस्सीखेच सुरू होती. त्यावर योग्य निर्णय व्हावा म्हणून शेतकरी व व्यापाºयांची शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले की, शेतकºयांना कच्चामाल उत्पादन करण्याकरिता आर्थिक व मानसिक या श्रमातून जावे लागते. बºयाचवेळा पिकांसाठी लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात ‘गिव्ह अँड टेक’ याप्रमाणे व्यापार होऊन दोघांमध्ये समन्वय साधून पपई दर निश्चित केले पाहिजे. यात कुणाचेही शोषण होऊ नये, अशी समन्वयाची भूमिका असावी, असे सांगितले. परंतु शेतकºयांनी आम्हाला योग्य भाव मिळाला तरच आम्ही पपई तोड करू देऊ अन्यथा दर निश्चित न झाल्यास २६ जानेवारीपासून पपई तोड बंद करण्यात येईल, असा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, उमाकांत पाटील, हिरालाल माळी, विश्वनाथ पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, ऋषीकेश चौधरी, राजाराम पाटील, गणेश मराठे, जयेश मराठे, मयूर पाटील, योगेश्वर पाटील, महेश सूर्यवंशी, निलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी घेतला आहे.