शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ...

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एका कंपनीकडून आपल्या तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड करण्यासाठी चार हजार टिशू कल्चर केळीची रोपे ६० हजार रुपयांत विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्यातक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली होती. पीक पूर्ण होईपर्यंत खते, मशागत व पीक संरक्षण याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनी करणार होती. भटू सोनार यांनी आपल्या नवलपूर शिवारातील तीन एकर क्षेत्रात २५ मे रोजी केळीच्या रोपांची लागवड केली. परंतु गेल्या २० दिवसांत केळी रोपांना पाण्यासह लक्षपूर्वक राखण केली. परंतु रोपे वाळली असून रोपे मरू लागली आहेत. त्यामुळे खराब रोपे देऊन संबंधित कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

शेतकरी भटू सोनार यांनी केळीची रोपे महिनाभरातच वाळायला लागली व रोपे वाळण्याचे कारण काय याबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित एजंटसह कंपनीलादेखील संपर्क केला. परंतु संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

नुकसानभरपाईची मागणी

तीन एकर क्षेत्रात चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यात प्रति रोप १५ रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा रोपांसाठी खर्च व लागवडीसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च असा ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला होता. त्यात रोपे वाळून (जळून) शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर कृषी विभागाने कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कर्ज काढून शेतात केळी रोपांची लागवड करण्यात आली होती. परंतु संबंधित कंपनीने खराब रोपे पाठवून फसवणूक केली आहे. याबाबत या कंपनीला खराब झालेल्या रोपांची माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मला रोपांसह लागवडीसाठी ७० ते ७५ हजार रुपये खर्च झाला असून नुकसानभरपाई देण्यात यावी.

- भटू पुरुषोत्तम सोनार, शेतकरी, लोणखेडा, ता. शहादा