शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ...

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एका कंपनीकडून आपल्या तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड करण्यासाठी चार हजार टिशू कल्चर केळीची रोपे ६० हजार रुपयांत विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्यातक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली होती. पीक पूर्ण होईपर्यंत खते, मशागत व पीक संरक्षण याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनी करणार होती. भटू सोनार यांनी आपल्या नवलपूर शिवारातील तीन एकर क्षेत्रात २५ मे रोजी केळीच्या रोपांची लागवड केली. परंतु गेल्या २० दिवसांत केळी रोपांना पाण्यासह लक्षपूर्वक राखण केली. परंतु रोपे वाळली असून रोपे मरू लागली आहेत. त्यामुळे खराब रोपे देऊन संबंधित कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

शेतकरी भटू सोनार यांनी केळीची रोपे महिनाभरातच वाळायला लागली व रोपे वाळण्याचे कारण काय याबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित एजंटसह कंपनीलादेखील संपर्क केला. परंतु संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

नुकसानभरपाईची मागणी

तीन एकर क्षेत्रात चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यात प्रति रोप १५ रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा रोपांसाठी खर्च व लागवडीसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च असा ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला होता. त्यात रोपे वाळून (जळून) शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर कृषी विभागाने कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कर्ज काढून शेतात केळी रोपांची लागवड करण्यात आली होती. परंतु संबंधित कंपनीने खराब रोपे पाठवून फसवणूक केली आहे. याबाबत या कंपनीला खराब झालेल्या रोपांची माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मला रोपांसह लागवडीसाठी ७० ते ७५ हजार रुपये खर्च झाला असून नुकसानभरपाई देण्यात यावी.

- भटू पुरुषोत्तम सोनार, शेतकरी, लोणखेडा, ता. शहादा